Homeमनोरंजनअमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

अमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

मनोरंजन (चित्र नगरी): बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण प्रीतिका रावनं तिच्या आणि हर्षद अरोराचा शो ‘बेइंतेहा’मध्ये असलेल्या रोमॅन्टिक सीन शेअर करण्यावरून एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. नेटकऱ्याला  उत्तर देत तिनं हर्षदवर महिलांना चुकीची वागणूक दिल्याचे देखील आरोप केले. नेटकऱ्यासोबत तिनं केलेल्या या चॅटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे स्क्रीनशॉट गुरुवारी रेडिटवर शेअर करण्यात आले आहेत. मेसेजमध्ये प्रीतिका त्या नेटकऱ्याला व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी आणि हर्षदविषयी गंभीर दावे करण्यावरून बोलताना दिसत आहे.

प्रीतिका रावनं कथितपणे नेटकऱ्याला म्हटलं की ‘तुला लाज वाटायला हवी. या व्हिडीओला आपल्या पेजवर टाकलेस. जो इंडस्ट्रीमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीसोबत झोपतो. अशा पुरुषासोबत माझे व्हिडीओ पोस्ट करू नका, असं मी तुला अनेकदा सांगितलं आहे. यापुढे याची काळजी घे. तू माझ्या आत्म्याच्या इच्छे विरोधात काही करत आहेस. कर्म तुझं आहे. त्याला तुलाच सामोरं जावं लागणार आहे.’

पुढे तिनं हे देखील सांगितलं की ‘जवळपास 95% हे नो-टच सीन होते. प्रीतिकानं लहिलं की बेइंतेहामध्ये 95% हे नो टच सीन होते आणि आमच्याजवळ 5 टक्के सीन होते आणि तुम्ही माझ्या इच्छे विरोधात हे सगळं करत आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी. माझे शब्द कायम लक्षात ठेवा तुम्ही तुमच्यावर वाईट कर्म घेऊन येत आहात.’

दरम्यान, या विषयी सांगायचं झालं तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमॅन्टिक ड्रामा ‘बेइंतहा’ मध्ये दोन दूरच्या चुलत भावंडांची कथा होती जे एकमेकांचे वैरी असतात. पण एका चुकीमुळे त्यांना एकमेकांशी लग्न करावं लागतं. वेळेनुसार, त्यांच्या नात्यात असलेलं हे वैरीच्या नात्यात हळू-हळू प्रेमाचे कमळ उमलू लागतात. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये शिवांगी जोशी, सुचित्रा पिल्लई आणि नावेद असलमसारखे कलाकार होते आणि त्यात लवकरच लोकप्रियता मिळवली. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रीतिका राव आणि हर्षदा अरोरा यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘बेइंतहा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रीतिका ही ‘लव का है इंतजार’ आणि ‘लाला इश्क’ सारख्या मालिकांमध्ये दिसली. या सगळ्यात हर्षदनं ‘गुम है किसी के प्यार में’, ‘ससुराल सिमर का’, ‘दहलीज’ आणि ‘देवों के देव…महादेव’ या मालिकांमध्ये दिसला. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!