Homeमनोरंजनविराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 100 व्या अर्ध्या शतकाच्या धावा करणारा पहिला...

विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 100 व्या अर्ध्या शतकाच्या धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला


आयपीएल 2025: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Rajasthan Royals VS Royal Challengers Bengluru) यांच्यात आयपीएल 2025 चा 28 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने 9 विकेटने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला असून यासह विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या दमदार परफॉर्मन्सने इतिहास रचला आहे. विराटने या सामन्यात टी 20 क्रिकेटमधील त्याचं 100 वं अर्धशतक ठोकलं असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय.

जयपूर येथील स्टेडीयमवर रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून आधी बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 173 धावा केल्या. आरसीबीला विजयासाठी 174 धावांची आवश्यकता असताना विराट कोहलीने 62, फिलिप सॉल्टने 65 आणि देवदत्त पड्डीकलने 40 धावा केल्या. विराट कोहलीने 33 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा केल्या. यासह राजस्थान विरुद्ध विराटने ठोकलेलं हे अर्धशतक विराटच्या टी 20 करिअरमधील 100 वं अर्धशतक होतं. अशी कामगिरी करणारा विराट हा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरलंय. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याने सर्वप्रथम टी 20 क्रिकेटमध्ये अर्धशतकाचं शतक करण्याची कामगिरी केली होती. सध्या त्याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 108 अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड आहे.

हेही वाचा : CSK मध्ये ऋतुराजच्या जागेवर खेळणार मुंबईचा खेळाडू? IPL ऑक्शनमध्ये राहिलेला Unsold

109 वेळा केलं अर्धशतक :

विराट कोहलीने आतापर्यंत 405 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 9 शतके आणि 100 अर्धशतक लगावून 13134 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 41.50 होती. टी 20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकाच्या बाबतीत बाबर आझम तिसर्‍या क्रमांकावर असून त्याने आपल्या करिअरमध्ये 90 अर्धशतक केली आहेत. तर ख्रिस गेल 88 अर्धशतकांसह नंबर चारवर तर जोस बटलर 86 अर्धशतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :

कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने स्पर्धेत 8252 धावा केल्या असून आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन 6769 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट आणि शिखर धवन यांच्या धावसंख्येत 1500 धावांचं अंतर आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!