Homeमहाराष्ट्रUnseasonal Rains And Hailstorms in Maharashtra | Jalgoan Rain | Pune Rain...

Unseasonal Rains And Hailstorms in Maharashtra | Jalgoan Rain | Pune Rain | Gondia Rainy Weather | Rain News | Weather Update | राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा: जळगाव, पुणे जिल्ह्याला झोडपले; पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान – Mumbai News

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके हातात येण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना निसर्गाने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आज पुन्हा

?

जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपले. यावल, चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, मका, केळी व इतर पिकांसह फळबागांनाही गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. सकाळी कडाक्याचे ऊन पडलेले असताना, दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुण्यात जुन्नर तालुक्याला पावसाचा तडाखा

दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातही दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी पावसाची हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची फळबागेची मोठी हानी झाली आहे. मात्र, या पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासाही मिळाला आहे.

गोंदियात प्रशासन सतर्क

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळपासून वादळी वारे वाहत होते. वातावरणात गारवा जाणवत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी अश्रय घ्यावा, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देत आज 13 एप्रिल रोजी 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला होता. यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!