Homeदेश-विदेशरजनीकांत त्याच्या आणि जे जयललिता यांच्यात लांब अफवा पसरविण्यामागील कारण प्रकट करते

रजनीकांत त्याच्या आणि जे जयललिता यांच्यात लांब अफवा पसरविण्यामागील कारण प्रकट करते

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर अखेर भाष्य केलं आहेत. दिवंगत नेत्या आणि चित्रपट निर्माते आर.एम. वीरप्पन यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे त्यांच्या नात्याला वळण मिळालं असा खुलासा त्यांनी केला आहे.

आर एम वीरप्पन यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीत रजनीकांत यांनी जयललिता यांनी केलेल्या वादग्रस्त सार्वजनिक टिप्पणीनंतर आरएम वीरप्पन यांना त्यांच्या मंत्रिपदावरून कसे काढून टाकले ते सांगितलं. हा कार्यक्रम वीरप्पन यांची निर्मिती कंपनी असलेल्या सत्य मूव्हीजने निर्मित ‘बाशा’ या चित्रपटाच्या 100 व्या दिवसाच्या समारंभादरम्यान घडला.

रजनीकांत यांनी ‘बॉम्ब कल्चर’वर केलं होतं भाष्य

रजनीकांत यांनी सभेला संबोधित करताना तामिळनाडूमध्ये “बॉम्ब संस्कृती” वाढत असल्याबद्दल इशारा दिला आणि चिंता व्यक्त केली की ही प्रवृत्ती राज्याला “स्मशानभूमी” बनवू शकते. त्यावेळी जयललिता वीरप्पन यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. रजनीकांत यांच्या मते, त्यांच्या वक्तव्यामुळे वीरप्पन यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. या निर्णयामुळे रजनीकांत यांना खूप वाईट वाटलं होतं.

रजनीकांत म्हणाले की, त्यांना त्या रात्री झोप लागली नाही. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी वीरप्पन यांच्याशी संपर्क साधून खेद व्यक्त केला. तथापि, ज्येष्ठ नेत्याने विनम्रतेने उत्तर दिलं आणि रजनीकांत यांना काळजी न करता नेहमीप्रमाणे काम सुरू ठेवण्यास सांगितलं. जेव्हा रजनीकांत यांनी जयललिता यांच्याशी बोलून याप्रकरणी स्पष्टता करावी का? अशी विचारणा केली असता वीरप्पन यांनी तसं न करण्याचा सल्ला दिल. त्यांनी म्हटले की, “तुमचा स्वाभिमान गमावू नका. मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी त्याच्याशी संलग्न नाही.”

तो क्षण आठवताना रजनीकांत भावूक झाले. त्यांनी आरएम वीरप्पन “खरा किंगमेकर” असल्याचं म्हटलं आणि जयललिता यांच्या राजकीय विरोधामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणून या घटनेचा उल्लेख केला. “मी त्यांच्याविरोधात का उभा राहिलो याचे हे एक प्रमुख कारण आहे,” असं रजनीकांत यांनी डॉक्यूमेंट्रीत म्हटलं आहे.

रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील वाद

1990 च्या दशकातही रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील मतभेदाच्या बातम्या प्रसिद्द झाल्या होत्या. विशेषतः जयललिता यांनी रजनीकांत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि काळ्या पैशांसंबंधी प्रत्युत्तरात, रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये रजनीकांत यांनी नेत्यांना राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव शस्त्र म्हणून वापरू नका किंवा त्यांच्या चाहत्यांमध्ये फूट पाडू नका असं आवाहन केलं होतं.

आरएमव्ही म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे आरएम वीरप्पन हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते तर तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख शक्ती होते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. रजनीकांत यांच्याशी त्यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय होती.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

नेपाळमध्ये जातीय हिंसाचार उसळला, 2 लोकांचा मृत्यू:अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू; कावड यात्रेदरम्यान डीजे वाजवण्यावरून...

0
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवार रात्री कावड यात्रेदरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून सुरू झालेला एक किरकोळ वाद आता मोठ्या जातीय तणावात बदलला आहे. सुरुवातीला...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
spot_img

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
error: Content is protected !!