राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखाणी यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे, प्रदीर्घ चर्चा आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर या नावांवर रात्री उशिरा अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने या यादीच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांतील प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील विजयाचे गणित लक्षात घेऊन भाजपने त्या-त्या भागातील प्रभावशाली नेत्यांना उमेदवारी दिली आहे. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देऊन भाजपने या भागात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातून अरुण लखाणी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. लखाणी हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे असल्याने त्यांच्या उमेदवारीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे दिल्लीतून झाली घोषणा विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी द्यायची, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये खलबतं सुरू होती. राज्यस्तरावर झालेल्या विविध बैठकांनंतर ४८ संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली होती. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे प्रभारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आज अंतिम ११ नावांची घोषणा करण्यात आली. उद्या शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता हे सर्व ११ उमेदवार उद्या आपापल्या संबंधित मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, या अर्जांनंतर विधान परिषदेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी विधान परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आजी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून आहे. तर अर्जांची छाननी २ जून रोजी होणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख ४ जून आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.
Source link
विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























