बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर’ येथे संस्थेच्या ४५ वर्षांच्या मानवतावादी सेवेच्या पूर्ततेनिमित्त आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते युवक विकास, उद्योजकता, शाश्वतता, चेतना अभ्यास आणि शिक्षण या क्षेत्रांशी संबंधित ५ राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. द आर्ट ऑफ लिविंगच्या प्रवासाच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. या सोहळ्यात ‘युथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’, ‘फॅकल्टी ऑफ इस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’, ‘आर्ट ऑफ लिविंग इनोव्हेशन अँड आंत्रप्रिन्युअरशिप इनक्युबेशन’, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शसनेस स्टडीज अँड ह्युमन पोटेंशियल’ आणि ‘इको शांती’ या पाच महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. हे उपक्रम पर्यावरण, नाविन्यता आणि मानवी विकासावर संस्थेचा वाढता भर दर्शवतात. कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी संस्थेच्या १८२ देशांमधील जागतिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “अंतर्गत शांतता हाच बाह्य समन्वयाचा पाया आहे, या विचाराने गुरुदेवांनी जगभरात शांतता आणि सौहार्दाचा संदेश पोहोचवला आहे.” कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही गुरुदेवांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी मानवी जीवनात ‘ज्ञान, ध्यान आणि संगीत’ या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या निर्मितीचे आवाहन केले. आपल्या भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी ‘श्री श्री गुरुकुलम’, ‘प्रताप गणपती मंदिर’, ‘श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग’ आणि सुमारे १,६०० देशी गायींचे निवासस्थान असलेल्या ‘श्री श्री गोशाळे’ला भेट देऊन पाहणी केली. महिनाभर चाललेल्या या उत्सवाची सांगता या सोहळ्याने झाली. या उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी, निरंजन हिरानंदानी आणि चित्रपट सृष्टीतील जॅकी श्रॉफ, राजकुमार हिराणी यांसारख्या देश-विदेशातील ६७८ प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली होती. ‘इंट्युइशन प्रोग्राम’ अंतर्गत मुलांनी सादर केलेले अंतर्ज्ञान क्षमतेचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
Source link
आर्ट ऑफ लिविंगला 45 वर्षे पूर्ण:गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 5 उपक्रमांचा शुभारंभ
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























