HomeमनोरंजनAbortion pills are being taken without doctor advice raising questions about women...

Abortion pills are being taken without doctor advice raising questions about women health, डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतल्या जाताय गर्भपाताच्या गोळ्या, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


हल्ली अनेक महिलांना असे वाटू लागले आहे की नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी ओटीसी गोळ्या घेणे हा एक सोपा, सुरक्षित असा वैयक्तिक मार्ग आहे. ऑनलाइन सहज उपलब्धत, सोशल मीडियावरील अपुरी माहिती आणि सामाजाच्या भीतीमुळे अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वमर्जीने औषधं घेतात. मात्र, हे भविष्यातील गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

गर्भपाताच्या गोळ्या हे सर्दी- खोकल्याच्या औषधाप्रमाणे सामान्य नाहीत. त्या घेण्याआधी योग्य वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचा अचूक कालावधी आणि योग्य डोस घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने गोळ्या घेतल्यास या गोळ्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. अनेक वेळा अपूर्ण गर्भपात होतो, म्हणजेच गर्भाचे काही अवशेष गर्भाशयातच राहतात. यामुळे तीव्र रक्तस्राव, वेदना आणि संसर्ग होऊ शकतो आणि वेळीच उपचार न केल्यास जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

अनेक महिला दीर्घकाळ होणारा रक्तस्राव आणि वेदना “सामान्य” समजून दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात किंवा विलंबाने जातात. त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर अ‍ॅनिमिया, संसर्ग किंवा अंतर्गत गुंतागुंतींसह रुग्णालयात दाखल होतात, जे योग्य वेळी उपचार घेऊन टाळता आले असते.

गर्भपाताच्या गोळ्यांचा शरीरावर होणारा परिणाम

अनेक महिला विचार न करता गर्भपाताच्या गोळ्या घेतात. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय या गोळ्यांचा वापर केल्यास हार्मोन संतुलन बिघडू शकते आणि त्यानंतर ३ ते ४ महिने मासिक पाळी अनियमित राहू शकते. गर्भपाताच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. जास्त रक्तस्रावामुळे अशक्तपणा येऊ शकतो, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात आणि त्यासाठी तातडीने उपचारांची गरज भासू शकते.

गर्भाशयात गर्भाचे अवशेष राहिल्यामुळे होणारा संसर्ग पुढे गर्भाशय आणि आसपासच्या अवयवांपर्यंत पसरू शकतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन उपचारांची गरज भासू शकते, ज्यामुळे महिलांवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना अनेक महिलांना ताण, अपराधीपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागतो.

भविष्यातील गर्भधारणेवर होतो परिणाम

वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या गर्भपातामुळे गर्भाशयाच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते. यामुळे वंध्यत्व, वारंवार गर्भपात होणे किंवा भविष्यातील गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो. संसर्गामुळे गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्युबमध्ये जखमा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यातील गर्भधारणेत अडचणी येतात. काही महिलांमध्ये गर्भाशयाबाहेरील गर्भधारणेचा (एक्टॉपिक प्रेग्नन्सी) धोका वाढतो, जी अत्यंत गंभीर आणि आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलेला सुरक्षित गर्भपात आरोग्यासाठी धोकादायक ठरत नाही. गर्भपात पूर्ण झाला आहे का आणि शरीर नीट सावरत आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टरांकडे फॉलोअप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता ओटीसी गोळ्यांचा वापर करून गर्भपात करणे सोयीचे वाटू शकते, पण ते  योग्य नाही. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास महिलांचे आरोग्य सुरक्षित राहते आणि भविष्यातील प्रजनन आरोग्य सुरक्षित व निरोगी राखता येते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!