उर्वाशिघोनो, झी मॅडी, नवी दिल्ली: जगभरात चर्चा असणाऱ्या महासत्ता रशिया देशानं पुन्हा अनेकांचं लक्ष वेधलं असून, यावेळी भारतीयांच्या नजरा विशेष वळल्या आहेत. कारण ठरतोय एक गंभीर मुद्दा. रशियन सैन्यात भरती झाल्याचे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. सात भारतीय युवकांना फसवून रशियन सैन्यात दाखल करण्यात आले असून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) जीव वाचविण्याची आर्त विनंती केली आहे. हे सर्वजण सध्या जीवघेण्या परिस्थितीत अडकले असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आपल्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठीची याचना केली आहे. (russia ukraine war SOS for Indians trapped in Russian army)
नागरिकांना सावध करूनही…
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, मागील वर्षभरात अनेक वेळा सरकारने भारतीय नागरिकांना सावध केले आहे की, रशियन सैन्यात जाणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. “भारतीय नागरिकांना अनेक वेळा इशारे देण्यात आले असून, आता पुन्हा एकदा आम्ही सर्वांना सांगतो की, अशा प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहा. यात जीव धोक्यात येऊ शकतो,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारत सरकारने दिल्ली आणि मॉस्कोमध्ये रशियन अधिकाऱ्यांसमोर चर्चेसाठीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारताने ठाम भूमिका घेत हे प्रकरण निकाली काढण्याची भूमिका मांडत त्यात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्याची मागणी केली आहे याशिवाय संबंधित भारतीय कुटुंबीयांशी संपर्क ठेवला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हे प्रकरण नवे नाही; नेमकं काय घडतंय?
हे प्रकरण नवे नाही. मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास अनेक भारतीयांना ‘चांगल्या नोकरीचे आश्वासन’ देत रशियात नेण्यात आले आणि नंतर त्यांना फसवून युद्धात ढकलण्यात आले. यापूर्वीही अशा अडचणीत सापडलेल्या काहींना परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर मायदेशी आणण्यात आले. मात्र अजूनही अनेकजण या संकटात अडकलेले असून त्यांचे प्राण धोक्यात आहेत हीच वस्तूस्थिती.
दरम्यान भारत सरकारकडून सद्यस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत परदेशातील ‘सैन्यात सामील होण्याच्या’ ऑफर्सपासून भारतीयांनी दूर राहावे असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. यामागे मानव तस्करीसारखे जाळे असल्याचा संशयही वर्तवला जात आहे. तेव्हा आता रशियातील भारतीय तरुणांकडे मदत नेमकी कशी पोहोचते आणि हे जाळे नेमके कुठवर पसरले आहे हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
FAQ
रशियात भारतीय नागरिकांना काय धोका आहे?
भारतीय नागरिकांना ‘चांगल्या नोकरी’च्या आमिषाने रशियात नेऊन त्यांना फसवून रशियन सैन्यात सामील करून युद्धात ढकलले जात आहे. यात त्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात.
भारत सरकारने याबाबत काय केले आहे?
भारत सरकारने भारतीय नागरिकांना वारंवार सावध केले आहे आणि दिल्ली व मॉस्कोमध्ये रशियन अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित करून अडकलेल्या भारतीयांना सोडवण्याची मागणी केली आहे. काहींना मायदेशी आणले गेले आहे, आणि सरकार संबंधित कुटुंबीयांशी संपर्कात आहे.
प्रश्न: हे प्रकरण कसे समोर आले?
मागील काही महिन्यांपासून अनेक भारतीयांना नोकरीच्या बहाण्याने रशियात नेऊन युद्धात ढकलल्याचे उघड झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपाने काहीजण सुखरूप परतले, पण अजूनही अनेकजण अडकलेले आहेत.






























