Homeदेश-विदेशबंदी घातली तरी दहशतवादी संघटनांना नाव बदलून पुन्हा सुरु, कसा चालतो खेळ?...

बंदी घातली तरी दहशतवादी संघटनांना नाव बदलून पुन्हा सुरु, कसा चालतो खेळ? आळा कसा घालणार? जाणून घ्या!


पाकिस्तान दहशतवादी संघटना: संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कारवाईचे अपयश पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  भारतावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यात आलीय. असे असले तरी त्याच संघटना नव्या नावाने पुन्हा उभ्या राहत असल्याचे दिसून आलंय.सध्या भारताने ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी संयुक्त राष्ट्राकडे केलीय. मात्र हे सगळं पुन्हा त्याच जुन्या चक्राचा भाग ठरतंय — “बंदी, नावबदल आणि पुन्हा सुरू.”

बंदी, नावबदल, पुन्हा सुरू

भारताने 2008 मध्ये मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात लॉबिंग करून लष्कर-ए-तोयबा (LeT) वर बंदी आणली. त्यानंतर तीच संघटना नव्या नावाने जमात-उद-दावा (JuD) म्हणून पुढे आली. काही वर्षांतच त्यावरही संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली — पण तिथेच साखळी थांबली नाही. आता LeT च्या नेतृत्वाखालीच निर्माण झालेली The Resistance Front (TRF) भारताच्या सुरक्षेसाठी नवी डोकेदुखी बनली आहे. मोठ्या संघटना आणि नावबदलाचं चक्र कसं चाललंय जाणून घेऊया.

मूळ संघटना नवीन नाव / पुढची फ्रंट :

लष्कर-ए-टोयबा (लेट) जमात- उद-दावा (ज्यू) → टीआरएफ

जैश-ए-मोहममड (जेईएम) अपहारी अप्पर-मुंजाहिडेन, गझवा-ए-हिंड

हरकत उल-मुजाहिद्दीन अल-उमर मुजाहिद्दीन

या सर्व संघटनांवर संयुक्त राष्ट्रांकडून बंदी आहे पण त्या पुन्हा नव्या रूपात उभ्या राहिल्या आहेत.  फक्त नावापुरत्या बंद्या पण जमीनवर काही परिणाम नसल्याचे चित्र आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 ठरावांनुसार या संघटनांवर बंदी घालण्यात आली. तरीही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत.

नोव्हेंबर 2008 मुंबईवरील हल्ल्यात LeT चा हात होता.  जानेवारी 2016 पठाणकोट हल्ला, सप्टेंबर 2016 चा उरी हल्ला आणि फेब्रुवारी 2019 चा पुलवामा आत्मघातकी हल्ला JeM ने घडवून आणला होता. 2020 नंतर TRF मार्फत काश्मीरमध्ये हल्ले करण्यात आले.  या साऱ्यांवरून स्पष्ट होते की, यूएनची कारवाई केवळ प्रतीकात्मक आहे. वास्तवात त्या फारसा परिणाम करत नाहीत.

भारताचा प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुधारणा आवश्यक

भारत सातत्याने TRF वर बंदी आणण्यासाठी पुरावे, माहिती आणि डोसिअर UN ला देत आहे. मात्र ही प्रक्रिया खूपच धीम्या गतीने चालते.  ‘हे एक निरुपयोगी चक्र आहे. तुम्ही एक संघटना बंदी घालता, ती दुसऱ्या नावाने परत येते. काय साध्य झालं?बंदी घालणे म्हणजे काहीच साध्य झाले नाही. तीच संघटना नव्या नावाने परत येते, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

UN दहशतवादी बंद्या फक्त प्रतीकात्मक असून अंमलबजावणीशिवाय बंदी निरुपयोगी आहे. बंदी- नावबदल- पुन्हा सुरू हे चक्र कायम असल्याचे दिसतंय.

संयुक्त राष्ट्रांच्या कारवाईने जर काहीच बदल घडत नसेल तर ती व्यवस्था सुधारण्याची वेळ आली आहे. फक्त नावापुरती बंदी नाही तर कठोर अंमलबजावणी, निधी थांबवणे आणि स्रोत बंद करणे हाच खरा उपाय आहे. नाहीतर TRF नंतर दुसरे नाव येईल पण धोका मात्र तसाच राहील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!