HomeमनोरंजनAshish Ubale : 'गार्गी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील 'तो'...

Ashish Ubale : ‘गार्गी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील ‘तो’ मठ…


आशिष मोजले: लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशिष अरुण उबाळे यांनी नागपुरमधील रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली. आशिष हे 58 वर्षांचे होते आणि त्यांनी काल 17 मे शनिवारी संध्याकाळी त्यांनी नागपुरमध्ये आत्महत्या केली. कर्जामुळे आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची सध्या बातमी समोर आहे. मात्र, त्यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं याविषयीचं सत्य अजून समोर आलेलं नाही. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

आशिष हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तणावात असल्याचं म्हटलं जातं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे जे रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना भेटण्यासाठी नागपुरला गेले. आशिष उबाळे हे मुळचे नागपूर येथील महाल भागातील आहे. तर मुंबईतील ते चुनाभट्टी परिसरात राहत होते. मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची नेहमीच चर्चा व्हायची.

नागपुरच्या रामकृष्ण मठात केली आत्महत्या

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, आशिष हे रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला होते. त्यांनी सकाळी मठात जेवणं केलं आणि नंतर थोडा आराम करण्यासाठी ते रुममध्ये गेले. त्यानंतर ते रूममधून बाहेर आलेच नाही. इतकावेळ भाऊ बाहेर आला नाही हे पाहता आशिष यांचे धाकडे भाऊ सारंग हे त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेले तर त्यांनी रूम उघडला नाही. इतकंच नाही तर अनेकदा आवाज दिल्यानंतरही काही उत्तर मिळालं नाही हे पाहता मठ प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली.

आशिष उबाळे यांनी एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून डिग्री घेतली. त्यानंतर ते सिनेसृष्टीत आपले नशिब आजमावण्यासाठी मुंबईत आले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असताना त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तर आशिष उबाळे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच तिथे पंचनामा केले. तर त्यात अशी माहिती समोर आली की आशिष उबाळे यांनी स्वत: ला व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती. त्यात त्यांनी कर्जाच्या ओझ्यापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यातून समोर आले आहेत.

आशिष उबाळे यांचं करिअर

आशिष उबाळे यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलं. त्यांनी ‘अग्नी’, ‘एका श्वासावे अंतर’, ‘गजरा’ आणि ‘चक्रव्यूह’ सारख्या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले. त्याशिवाय त्यांनी ‘गार्गी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. याशिवाय त्यांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ आणि ‘बाबुरावला पकडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर त्यांचा ‘गार्गी’ हा चित्रपट 2009 मध्ये नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!