Homeदेश-विदेशनरकटला स्वर्ग पुस्तक संजय राऊत यांनी उधव ठाकरे लीड महा विकास अगाडी...

नरकटला स्वर्ग पुस्तक संजय राऊत यांनी उधव ठाकरे लीड महा विकास अगाडी सरकारला तुरुंगवासाच्या मुदतीबद्दल चेतावणी दिली.


महा विकास भाजपाने संजय राऊतला अर्पण केले: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने धमकावलं होतं. यासंदर्भातील गौप्यस्फोट स्वत: राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. “सरकार पाडायला मदत करा अन्यथा तुरूंगात जाल,” अशी धमकी संजय राऊत यांना त्यांच्या दिल्लीत निवासस्थानी जाऊन एका भाजपा नेत्याने दिल्याचा संपूर्ण घटनाक्रम राऊतांनी पुस्तकामध्ये सांगितला आहे. नेमकं राऊतांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांमध्ये अगदी जसंच्या तसं…

“मी दिल्लीत असताना एके दिवशी रात्री नऊ वाजता भाजपा परिवारातील माझ्या हितचिंतकाचा फोन आला. ते म्हणाले, “भेटायला यायचं आहे. बरोबर कुणीतरी आहे. विषय महत्त्वाचा आहे.” “यायला हरकत नाही,” असे कळवताच माझे हितचिंतक मित्र आणि इतर तिघे जण 15, सफदरजंग लेनवर पोहोचले. चहापान करत दिल्लीतील घडामोडींवर गप्पा झाल्या. त्या काळी माझे हे हितचिंतक महाराष्ट्रातून दिल्लीत संघ परिवाराच्या संघटन कार्यासाठी मुक्कामास होते. वैचारिक मतभेद असतानाही आमच्यातले नाते कायम राहिले. “संजयजी, महाराष्ट्रातले सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आले आणि ते फार काळ चालवता येणार नाही, असे दिल्लीतील आमच्या लोकांचे म्हणणे आहे,” त्या मित्राने बोलायला सुरुवात केली.”

“तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?”

“तुम्ही सुज्ञ आहात!”

“हे तुमच्याबरोबरचे कोण? आपण परिचय करु दिला नाही…” मी.

“हे संघ परिवारातील माझे सहकारी आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.”

“लक्ष कोणावर?”

“खास करुन तुमच्यावर…”

“च्या?”

“सरकार आणण्यात तुमचा सहभाग आहे. आता हे सरकार घालवण्यासाठी तुमचंच सहकार्य हवं. या सरकारच्या पाठीशी उभे राहू नका.”

नक्की वाचा >> ”मातोश्री’च्या गेटवर घामाघूम…’, गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी अमित शाहांना कसं वाचवलं? राऊतांचा गौप्यस्फोट

“आता या सरकारशी माझा तसा संबंध नाही. सरकार मजबूत आहे आणि एकदा आलेली सत्ता सहसा कोणी सोडत नाही,” मी.

“तुम्ही आम्हाला मदत करू शकता.”

“कशी?”

“आम्ही शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावतोय. काम सुरु आहे. तुम्ही उगाच आडवे येऊ नका.”

“आमचे आमदार कशाला फुटतील?”

“फुटतील! तुम्ही गप्पा राहा. जमल्यास सामील व्हा. महाराष्ट्रात उलथापालथ होईल.”

“आम्ही सरकार वाचवू. मोठे बहुमत आहे. पक्षांतरविरोधी कायद्यात आमदारांची फूट बसणार नाही. विधानसभा अध्यक्ष जागेवरच निर्णय घेतील!”

“तुम्ही सगळे अंधारात आहात. मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतोय, शात राहा. नाहीतर ईडी, सीबीआय तुम्हाला थंड करेल. तशा हालचाली सुरू आहेत. तुम्ही एकटे पडाल! महाराष्ट्रातले सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावे लागेल!”

“ही तर धमकी आहे,” मी.

“मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सावध करायला आलोय. काळजी घ्या!”

रात्री अकरा वाजता ‘हितचिंतक’ म्हणवून घेणारे निघून गेले. मी त्यानंतर अस्वस्थपणे बंगल्याच्या मागच्या बाजूला येरझाऱ्या घालू लागलो.

आज पुस्तकाचं प्रकाशन

राऊत यांनी लिहिलेल्या, ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज म्हणजेच, शनिवारी, 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन पार पडणार आहे.  या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!