Homeदेश-विदेशइंडियाने दहशतवादी दहशतवादी प्रायोजकत्व आक्षेप असूनही पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंधूर स्पष्ट केले...

इंडियाने दहशतवादी दहशतवादी प्रायोजकत्व आक्षेप असूनही पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंधूर स्पष्ट केले आयएमएफ पाकसाठी 1 अब्ज डॉलर्स बेलआउट का नाही


आयएमएफला पाकिस्तानला मदत केली पण का: वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच आयएमएफच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला 1 बिलियन अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची मंजूरी देण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार हे कर्ज 8542 कोटी 48 लाख 90 हजार रुपये इतकं होतं. पाकिस्तानला हे कर्ज मिळू नये म्हणून भारताने प्रयत्न केले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये भारताने मतदान न करता गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानला मदत करण्याचा हा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात ‘नाही’ असं मत का केलं नाही असा प्रश्ना विचारला जात आहे. त्यासाठी आयएमएफच्या बैठकीचे काही नियम समजून घेणं गरजेचं आहे. भारत आयएमफच्या बैठकीत अनुपस्थित का राहिला आणि आता भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान आक्रमक होऊन भारतीय सीमा भागात अधिक आवेशाने का हल्ले करत आहे हे समजून घेऊयात…

आयएमफमध्ये कर्ज देण्याचा निर्णय कसा होतो?

* आयएमफच्या कार्यकारी मंडळात 25 संचालक असतात. हे संचालक सदस्य देश किंवा देशांच्या समूहांचे प्रतिनिधित्व करतात.
* हे मंडळ कर्ज मंजुरीसारख्या दैनंदिन निर्णयांवर काम करते.
* संयुक्त राष्ट्रांप्रमाणे प्रत्येक देशाला एक मत नसते.
* आयएमफमध्ये मतदानाची ताकद सदस्य देशांच्या आर्थिक आकारावर आधारित असते.
* ज्या देशांचा आर्थिक वाटा जास्त, त्यांना अधिक मतदानशक्ती मिळते (जसे की अमेरिकेला).
* आयएमफ सहसा मतैक्याने निर्णय घेते. पण जिथे मतदान आवश्यक असते तिथे “नाही” मत देण्याचा पर्याय नसतो.
* संचालक फक्त ‘समर्थन’ किंवा ‘दूर राहणे’ हेच दोन पर्याय निवडू शकतात.

भारत का दूर राहिला?

* भारताने पाकिस्तानला आयएमफच्या कर्ज मंजुरीच्या मतदानातून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
* याचे कारण विरोध नसून आयएमफच्या नियमांनुसार ‘नाही’ मत देणे शक्य नव्हते.
* भारताने दूर राहून आपला तीव्र विरोध नोंदवला आणि आक्षेप मांडले.

भारताने मांडलेले आक्षेप कोणते?

1) आयएमफच्या मदतीचा परिणामकारकपणा:

गेल्या 35 वर्षांत पाकिस्तानने 28 वेळा आयएमफची मदत घेतली. ज्यात केवळ मागील 5 वर्षांत 4 कार्यक्रम होते. यानंतरही कोणतेही ठोस आणि शाश्वत सुधारणा झालेल्या नाहीत.

2) लष्कराचं वर्चस्व:

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत लष्कराचे प्रबळ वर्चस्व आहे.यामुळे पारदर्शकता, नागरी नियंत्रण आणि शाश्वत सुधारणा दुर्बळ होतात.

3) दहशतवादाला समर्थन:

भारताने अशा देशाला निधी देण्यास विरोध केला जो सीमापार दहशतवादास प्रोत्साहन देतो.अशा मदतीमुळे जागतिक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, असं भारताने म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!