Homeमहाराष्ट्रDCM Eknath Shinde Reacts On Uddhav Raj Thackeray alliance

DCM Eknath Shinde Reacts On Uddhav Raj Thackeray alliance


Eknath Shinde On Uddhav Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदीविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितरित्या मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी मोर्चाची घोषणा केल्यानंतर त्यांनी संजय राऊतांशी चर्चा करुन वेगळा मोर्चा काढण्याऐवजी संयुक्त मोर्चा काढण्याची सूचना केली आणि ती उद्धव यांनी राऊतांच्या माध्यमातून स्वीकारली. याच साऱ्या घडामोडीवरुन शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिंदेंचा खोचक सल्ला

ठाकरे बंधू एकत्रपणे मोर्चा काढणार, राज आणि उद्धव यांनी संवाद साधला असा संदर्भ देत पत्रकारांनी नागपूरमध्ये शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावताना, “किती उतावीळ झाले. किती अगतिक झाले. ही वेळ का आली? ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते, ज्या पक्षाला तुम्ही कस्पटा समान समजत होते, त्या पक्षाबद्दल युती करा, युती करा, असे म्हणण्याची पाळी का आली? याचा आत्मचिंतन करा,” असा खोचक सल्ला शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. साधारण दीड वर्षापूर्वी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा मनसेचा उल्लेख ‘संपलेला पक्ष’ असा केला होता. याचीच आठवण शिंदेंनी आपल्या विधानातून करुन दिली.

ती काही लोकशाही होती का?

5 तारखेला आयोजित केलेल्या मोर्चाबद्दल बोलताना शिंदेनी मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही असं स्पष्ट केलं आहे. “लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन करू शकतो, कोणी कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकतो. 2019 मध्ये आम्ही पाहिलं, ज्या पक्षासोबत लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही खंजीर खुपसलं आणि काँग्रेससोबत घरोबा केला. हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे आणि त्याचं फळही त्यांना भेटलं आहे. मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. लोकशाहीत कोणीही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो. आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे. त्या सरकारच्या काळात आम्ही पाहिला आहे पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले ती काही लोकशाही होती का?” असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> हिंदी भाषा धोरणासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं दोषी; म्हणाले, ‘मी राज ठाकरेंशी…’

आमच्यात इगो नाही

“आम्हाला, मुख्यमंत्र्यांना कुठलाही इगो नाही. चर्चेतून प्रश्न सुटतात. आम्हाला इगो नाही आडमुठेपणाच्या धोरणाची भूमिका आम्ही घेतलेली नाही. चर्चा सुरू झाल्यानंतर आमच्या सरकारने अनिवार्य शब्द काढून टाकला.  त्यामुळे आता मराठी सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही,” असंही शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!