Homeमनोरंजनइंग्लंड टूर कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा...

इंग्लंड टूर कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा घेणारी इंड.


Ind vs eng: जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज  खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी येत्या शनिवार 24 मे रोजी भारतीय टेस्ट संघाची घोषणा करण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट अशी की, माजी टेस्ट कर्णधार आणि ओपनिंग फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि तसेच मिडल ऑर्डरचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे टेस्ट टीम इंडियात (Team India) विराट आणि रोहितची जागा कोण घेणार याविषयी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकतता आहे मीडिया रिपोर्ट्समधून काही खेळाडूंची नावं समोर आली आहेत जे रोहित आणि विराटची रिप्लेसमेंट म्हणून ओपनिंग आणि मिडल ऑर्डरला फलंदाजीसाठी उतरू शकतात.

कोण घेणार रोहित शर्माची जागा?

7 मे रोजी अचानकपणे भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निवृत्तीवर त्याच्या फॅन्सना धक्का बसला होता कारण रोहित 12 महिन्यात क्रिकेटच्या दुसऱ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत होता. वर्ल्ड कप 2024 नंतर टी 20 क्रिकेटमधून रोहितने निवृत्ती घेतली होती. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार असण्यासोबतच ओपनिंग फलंदाज सुद्धा होता. त्यामुळे त्याची जागा संघात कोणता खेळाडू घेणार याची उत्सुकतता आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे भारताचे ओपनिंग्ज पार्टनर होते. आता रोहितने निवृत्ती घेतल्यावर केएल राहुल ओपनिंग फलंदाजांची भूमिका पार पडेल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. केएल राहुल इंग्लंड दौऱ्यात ओपनिंग फलंदाज म्हणून उतरू शकतो. तसेच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणारा फलंदाज साई सुदर्शन याचं सुद्धा इंग्लंड दौऱ्यात भारतीय टेस्ट संघात पदार्पणाची  शक्यता आहे. असे झाल्यास ओपनिंग फलंदाज म्हणून त्याला सुद्धा संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा : प्लेऑफपूर्वी RCB ने का बदलला कॅप्टन? जितेश शर्माला दिली नेतृत्व करण्याची संधी, कारण आलं समोर

कोण घेणार विराट कोहलीची जागा?

रोहित पाठोपाठ 12 मे रोजी विराट कोहलीने देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यापूर्वी विराटने देखील 2024 मध्ये टी 20 मधून निवृत्ती घेतली होती. जानेवारी महिन्यात बीसीसीआयच्या सांगण्यावरून रणजी क्रिकेट खेळणारा विराट हा टेस्ट क्रिकेटमधून एवढ्या लवकर निवृत्त होईल याची त्याच्या फॅन्सना अपेक्षा नव्हती. विराट कोहली हा भारताच्या टेस्ट संघात गेल्या काही काळात चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येत होता. तेव्हा आगामी इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिल हा विराट ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल हा 2020 पासून टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा भाग आहे. सुरुवातीला तो रोहित सोबत ओपनिंगला फलंदाजी करायचा, मात्र त्यानंतर तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरू लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार इंग्लंड दौऱ्यात विराटच्या जागी शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

शुबमन गिलकडे नेतृत्व:

रोहित शर्मा टेस्टमधून निवृत्त झाल्यावर टीम इंडियाचा नवा टेस्ट कर्णधार कोण असणार याबाबत अनेक नाव समोर येत होती. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा इत्यादी कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर आणि सिलेक्टर्स कमिटीने इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा टेस्ट कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावावर मोहोर लावलेली आहे. आयपीएल स्थगित झाल्यावर दिल्ली येथे हेड कोच गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांची जवळपास २ तास मिटिंग झाल्याची माहिती सुद्धा मिळतेय. यात टेस्ट संघाचा कर्णधारपदावरून गंभीर आणि गिल यांच्यात चर्चा झाली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!