Homeमनोरंजनजागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 लक्षणे आरोग्य बातम्या खबरदारी

जागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 लक्षणे आरोग्य बातम्या खबरदारी


जागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 : संपूर्ण जगभरात 22 मे हा दिवस  प्री-एक्लेम्पसिया दिन म्हणून ओळखला जातो. गरोदरपणादरम्यान महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि तत्सम स्थिती अर्थात  प्री-एक्लेम्पसियाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्याच्या हेतूनं हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

प्री-एक्लेम्पसिया म्हणजे नेमकं काय?

वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी, डॉ. मीरा पाठक यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार  प्री-एक्लेम्पसिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळं साधारण पाच ते आठ महिला त्याचा सामना करतात. या स्थितीमध्ये लक्षणं अतिशय सौम्य असल्या कारणानं अनेकदा ती लक्षातही येत नाही. सहसा गरोदरपणादरम्यान 20 आठवड्यांनंतर जर गर्भधारणा झालल्या महिलेचा रक्तदाब अर्था ब्लड प्रेशर 140/90 पेक्षा वाढत असेल, शरीराला सूजयेत असेल आणि युरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असेल तर ही शारीरिक स्थिती  प्री-एक्लेम्पसियाकडे खुणावते.

प्री-एक्लेम्पसियाच्या कारणांवर प्रकाश टाकल्यास प्लेसेंटमध्ये होणारी अस्थिरता यामागचं मुख्य कारण असून, पहिली गर्भधारणा, हायपरटेंशन, मधुमेह, थायरॉईड, ट्विन किंवा मोलर प्रेगनेन्सी, स्थुलता अशा कारणांचा समावेश आहे.

प्री-एक्लेम्पसियावर उपाय काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अनेक महिलांमध्ये  प्री-एक्लेम्पसियाची लक्षणंच दिसत नाहीत. मात्र चाचण्यांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येतो.  प्री-एक्लेम्पसियाच्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, धुरकट दिसणं, हातपाय सुजणं, पोटाच्या वरील भागात वेदना, मळमळ, उलटी, महिन्याभरात 4 किलोहून अधिक वजन कमी होणं, फेसाळ लघ्वी होणं अशी लक्षणं आढळतात. तर, गंभीर प्रकरणांमध्ये भोवळ येण्याचंही लक्षण आढळतं, जिथं ही स्थिती रुग्णाला कोमातही पाठवू शकते.

डॉ. पाठक यांच्या माहितीनुसार अनियंत्रित रक्तदाबामुळं ब्रेन स्ट्रोक, झटके योणं, रक्तस्त्राव वाढणं, हृदयविकार, किडनी निकामी होणं अशा गंभीर समस्या उदभवतात. एखाद्या व्यक्तीला  प्री-एक्लेम्पसियामुळं फिट आल्यास गर्भवती मातांना गर्भपात, गर्भातच बाळाचा मृत्यू, आययुजीआर म्हणजे अंतर्गर्भाशयी विकास मंदता, प्रिमॅच्योर डिलीव्हरी अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

प्री-एक्लेम्पसियवारी उपाय

सातत्यानं रक्तदाब तपासत राहण्यापासूनच प्री-एक्लेम्पसियाच्या उपायांची सुरुवात होते. जीवनशैलीमध्ये बदल, नियमित व्यायाम, योगसाधना, कमी ताण घेणं अशा सवयी इथं फायद्याच्या ठरतात. शिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ, साखर, मीठ, तेलकट पदार्थ यांचं सेवन कमी केल्यास त्यामुळंही सकारात्मक फायदा दिसतो. अनेकदा डॉक्टरांटच्या सल्ल्यानं प्री-एक्लेम्पसिया असणाऱ्यांना रक्तदाब नियंत्रणात आणणारी औषधंसुद्धा दिली जातात. गर्भवती महिलांमध्ये या स्थितीत 37 आठवड्यांपर्यंत गर्भधारणा सुरक्षित असते. जिथं कोणताही धोका नसल्यास प्रसूती केली जाते.

परिस्थिती बिघडून रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यानं महिलेच्या शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं अनेकदा डॉक्टर महिलेटचा जीव वाचवण्यासाठी वेळेआधीच प्रसूतीचा सल्ला देतात. डॉ. पाठक यांच्या माहितीनुसार सहसा प्रसूतीच्या 48 तासांनंतर महिलेचा रक्तदाब वाढू शकतो. पुढील 6 आठवड्यांसाठी हीच स्थिती कायम राहून भविष्यात त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो.

(वरील माहिती डॉक्टरांचा हवाला देत वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!