Homeदेश-विदेशज्योती मल्होत्राने 'ती' चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, 'या' कारणांमुळे बळावला संशय!

ज्योती मल्होत्राने ‘ती’ चूक करुन स्वत:साठीच खणला खड्डा, ‘या’ कारणांमुळे बळावला संशय!


ज्योती मल्होत्रा: मागील अनेक दिवसांपासून ज्योती मल्होत्राच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणेचं लक्ष होतं. ती काय करते? कुठे जाते? कोणासोबत तिचे जास्त संपर्क आहेत अशा अनेक गोष्टीवर लक्ष ठेवलं जात होतं. तसंच ती मागील काही दिवसात कुठे गेली होती? यासंदर्भातली देखील माहिती घेतली.. आणि त्यानंतर ज्योतीला अटक करण्यात आली. दरम्यान अशी कोणती कारणं होती ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांचा ज्योतीवरील संशय बळावला होता? जाणून घेऊया.

कमी कमाई आणि लॅविश लाईफस्टाईल

भारताशी गद्दारी करत ज्योती मल्होत्रानं देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरूय..ज्योतीनं 2 वर्षात तिनदा केलेला पाकिस्तानचा दौरा आणि कमी इनकम असतांना तिती लॅवीश लाईफ अशा अनेक कारणांमुळे ती गुप्तचर यंत्रणांच्या टार्गेटवर आली होती..

कोणत्या कारणांमुळे ज्योतीवर संशय?

ज्योती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानचं गुणगाण गात असायची. ज्योती मल्होत्रा काही दिवसांपूर्वी बाली येथे गेली होती. ज्योती मल्होत्रा बालीला असताना तिच्यासोबत एक पाक अधिकारी होता. पाकिस्तानमध्ये असताना तिनं पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफशी संपर्क साधला होता. ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती. पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते. तसंच पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा लगेच मिळत नाही. व्हिसा घेण्यासाठी मोठी प्रोसेस असते. पण ज्योती मल्होत्राला व्हिसाही लगेच मिळाला. याशिवाय ती लग्जरी जीवन जगत होती. या सर्व गोष्टींमुळे तपास यंत्रणांना ज्योतीवर संशय आला आणि ती रडारवर आली.

पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात

पाकिस्तानचा दौ-यात तिची ज्या पाकिस्तानी अधिका-यासोबत ओळख होती. तो अधिकारी भारताच्या पाकिस्तानी उच्चालयात देखील होता. तसंच त्याच्यासोबतचे ज्योतीचे पाकिस्तानमधील फोटो देखील समोर आले आहेत. तसंच त्या पाकिस्तानी अधिका-याचा पहलगाम हल्ल्यानंतर एक केक घेऊन जातांनाचव्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे पाकिस्तान ते दिल्लीपर्यंत पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात ज्योती मल्होत्रा होती.

पर्यटकांनाच दोषी ठरवलं

यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योतीनं पहलगाममध्ये गेल्याची देखील माहिती आहे.

विविध देशांचे दौरे

ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसारमध्ये राहत होती. कोरोना काळात तिनं तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. सुरुवाती ती स्थानिक व्हिडिओ अपलोड करत होती. मात्र, नंतर तिनं चीन, थायलंड, पाकिस्तान, भूतानचे दौरे केले.

कारागृहाच्या 4 भिंतीआड काढावं लागणार आयुष्य

ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. तिनं कशापद्धतीनं भारताविरोधात कट रचण्यात पाकिस्तानला मदत केली. पाकड्यांनी दिलेल्या पैशांवर ज्योती आतापर्यंत लॅवीश लाईफ जगली मात्र, आता कारागृहाच्या चार भिंतीआड गद्दार ज्योतीला आपलं आयुष्य काढावं लागणार यात शंका नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!