HomeमनोरंजनHow much of her mother's hard work is behind Saina Nehwal's success?...

How much of her mother’s hard work is behind Saina Nehwal’s success? She herself gave a glimpse into the memories | “आई मला रात्रभर…”, सायना नेहवालच्या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे? स्वतः दिला आठवणींना उजाळा


तिच्या प्रवासात सायना नेहवाल: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिचं नाव आज जगभर ओळखलं जातं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये (2012 London Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकणारी सायना लाखो मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. पण या यशामागे केवळ मेहनतच नाही, तर तिच्या आईची असीम माया आणि त्यागही आहे. सायनाने स्वतः लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आईबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे हे तिने सांगितले आहे.

दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

सायनाने ‘लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सायनाने कमी वयातच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. यासाठी तिच्या आईने खूप मेहतनत घेतली होती. याबद्दल सायना म्हणाली की, “तेव्हा मला फिजिओ ट्रेनर्सविषयी काहीच माहिती नव्हती. दिवसा ट्रेनिंग केल्यावर माझी आई रात्रीभर बसून माझी मालिश करायची. आज जेव्हा याचा विचार करते तेव्हा वाटतं की, आईला कसं कळायचं की मला पुढच्या दिवशी रिकव्हर व्हायचं आहे? त्यांना एवढी माहिती कशी होती?” याशिवाय सायनाने हे ही सांगितले की, ” मी खूप लकी होते कारण माझ्या आईला माहित होते कि मला मदत कशी करायची हे माहित होते. माझा पालकांना हे ही माहित होत चांगले जेवण देऊन मला मजबूत बनवणे गरजेचे आहे.”

हे ही वाचा: विराटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोहली पुन्हा दिसू शकतो पांढऱ्या जर्सीत… मिळाली मोठी ऑफर

मित्र-मैत्रीण सुटले

सायनाने हेही सांगितले की, तिला बालपणी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता आला नाही, पण त्याचं काहीही वाईट वाटत नाही. “मी जे काही केलं ते देशासाठी केलं. फोडियमवर उभं राहून देशाचा अभिमान वाढवणं, हीच खरी कमाई आहे.”

हे ही वाचा: Video: निसर्गानेही विराटला ठोकला सलाम! पक्ष्यांनी किंग कोहलीला दिला ट्रिब्यूट, बेंगळुरू स्टेडियमवरती दिसले अद्भुत दृश्य

सायनाचे यश

सायनाच्या महत्त्वाच्या यशांमध्ये 2012 चं ऑलिम्पिक ब्रॉन्झ, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन मेडल्स, आणि कॉमनवेल्थ गेम्समधील पाच पदकांचा समावेश होतो. ती भारताची पहिली वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू ठरली.

हे ही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार! करुण नायरचे झाले दमदार पुनरागमन

सायनाचं यश हे केवळ कोर्टवरचं नाही, तर आईच्या मायेच्या रुपात तिच्या पाठीमागे असलेल्या आधाराचंही फलित आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!