Homeदेश-विदेशभारताच्या सुदर्शन चक्रानं पाकचा धुव्वा, पाकिस्तानचे 400 हून अधिक ड्रोन्स हवेतच नष्ट

भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकचा धुव्वा, पाकिस्तानचे 400 हून अधिक ड्रोन्स हवेतच नष्ट


मुंबई : भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं.  भारतानं याचे पुरावेही दिले आणि इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऑपरेशन सिंदूरची दखल घेतली गेली. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावणारं भारताचं ते अस्त्र कोणतं? त्याला सुदर्शन चक्र असं नाव का दिलं गेलं? याबाबत जाणून घेऊयात.

भारताची संरक्षण सिद्धता सगळ्यांना ज्ञात होतीच पण आता ती पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे.  त्याला कारणीभूत ठरला पाकिस्तान. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पाकिस्तानवर सूड उगवला. तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण यामुळे पिसाळलेल्या पाकनं भारतावर गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले. भारताच्या नागरी वस्त्यावर हल्ल्याचा पाकचा नापाक डाव आपल्या सैन्यानं लीलया परतवला. यात मोलाची कामगिरी बजावली ती सुदर्शन चक्रानं.  याच्या एकाच हल्ल्यात संपूर्ण पाकिस्तानची संरक्षण प्रणालीच बेचिराख झाली. पाकनं 36 जागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. 400 हून अधिक ड्रोन्स डागले पण आपल्या सुदर्शन चक्रानं हवेतच नष्ट केले. हे सुदर्शन चक्र म्हणजे ‘भारताची एअर डिफेन्स सिस्टीम’ आहे.

कर्नल सोफिया यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश केला. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्राचं उल्लंघन करत नाही तर सामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या विमानांचाही युद्धात ढाल म्हणून वापर करतोय, असं त्या म्हणाल्या. पण भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकिस्तानला नामोहरम केलं. पाकचा प्रत्येक ड्रोन, प्रत्येक क्षेपणास्त्र आणि एफ 16 सारखी हेलिकॉप्टर्सचा भारतानं हवेतच चुराडा केला.

एअर डिफेन्स सिस्टीमची वैशिष्ट्यं

– S- 400 ही भारताची एअर डिफेन्स सिस्टीम हेच भारतीय सुदर्शन चक्र
– 600 किलोमीटरचं क्षेत्र व्यापते आणि शत्रूचा वेध घेते
– S- 400 जिथे असेल तिथल्या 400 किलोमीटरची सर्वत्र सुरक्षा ठेवते
– शत्रुचं कोणतंही ड्रोन, क्षेपणास्त्र, विमान हवेतच नष्ट करते
– ही सिस्टीम चालत्या वाहनावर तैनात असते
– एकाच वेळी 80 लढाऊ विमानं आणि ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रावर हल्ला केला जाऊ शकतो
– सिस्टीम भारतानं 2018 मध्ये रशियाकडून खरेदी केली

पाकिस्तानचा प्रत्येक डाव आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं उधळवून लावला त्यामुळे शत्रूसाठी कर्दनकाळ ठरलेलं हे सुदर्शन चक्र आपल्यासाठी सुरक्षा कवच ठरलं आहे.  या एअर डिफेन्स सिस्टीमची अचूकता शत्रुला धडकी भरवणारी आहे. कारण पाकिस्ताननं पूर्ण हवाई हल्ले सुरू केले तरी राजस्थानपासून पंजाब आणि काश्मीरपर्यंतच क्षेत्रात कुठलंही क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान येवो, ते उद्ध्वस्त करणं आपल्याला सहज शक्य आहे. पाकची लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं शेकडो किलोमीटरवरूनच नष्ट केली. यातच या सुदर्शन चक्राच्या यशाचं गमक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!