Homeमनोरंजनआरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांनी खुलासा केला की त्यांनी वचन तोडल्यामुळे त्यांना...

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांनी खुलासा केला की त्यांनी वचन तोडल्यामुळे त्यांना संघात यायचे नव्हते


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये जेव्हा संघाने आपल्याला आश्वासन दिल्यानंतरही दुर्लक्ष केलं तेव्हा प्रचंड नाराजी आणि संताप झाला होता असं उघड केलं आहे. संघातील खेळाडू जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं होतं. आयपीएल 2025 मध्ये विरा कोहलीनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं तेव्हा प्रचंज दबाव होता, मात्र विराटच्या सहकार्य दाखवणाऱ्या शब्दांमुळे दिलासा मिळाला असाही खुलासा त्याने केला. कर्णधारपदासह रजत पाटीदर मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिकाही योग्य साकारत आहे. त्याने 11 सामन्यात 239 धावा केल्या आहेत.

“आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाआधी मला तू तयार राहा असा मेसेज मिळाला होता. आम्ही तुझी निवड करु असं सांगण्यात आलं होतं. मला बंगळुरु संघात खेळण्याची पुन्हा संधी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. पण मेगा लिलावात मला निवडण्यात आलं नाही. मी थोडा नाराज होतो,” असं पाटीदारने बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं.

पण 31 वर्षीय रजत पाटीदारला आरसीबीकडून खेळण्यासाठी फार वाट पाहावा लागली नाही. कारण संघातील एक खेळाडू जायबंदी झाल्याने त्याला लगेच संघातून खेळण्यासाठी बोलावणं आलं. पण रजत पाटीदारला आपल्या खेळण्याची संधी फार कमी मिळेल याची कल्पना असल्याने तो संघात परतण्यास उत्सुक नव्हता.

“लिलावात निवड न झाल्याने मी इंदोरमध्ये स्थानिक सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला फोन आला की, लवनिथ सिसोदिया जखमी झाल्याने आम्ही तुझी निवड करत आहोत. पण तुम्हाला खऱं सांगायचं तर मला बदली खेळाडू म्हणून जाण्याची इच्छा नव्हती. कारण मला खेळण्याची फार संधी मिळणार नाही याची कल्पना होती, मला डगआऊटमध्ये बसण्याची इच्छा नव्हती,” असं रजत पाटीदार म्हणाला.

“मी रागावलो नव्हतो. माझं असं झालं होतं की, जर मला लिलावात निवडलं नसेल तर मला खेळायला मिळणार नाही. काही वेळासाठी रागावल्यानंतर नंतर मी सामान्य झालो,” असं पाटीदार म्हणाला.

विराट कोहलीसारख्या महान खेळाडूनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर फार दबाव होता, मात्र त्याने पाठिंबा दिल्याने आत्मविश्वास वाढल्याचंही तो म्हणाला. त्याने सांगितलं की, “माझ्या मनात फार प्रश्न होते. संघात इतके मोठे खेळाडू आहेत. विराट इतका मोठा खेळाडू असताना त्याच्यासह कसं खेळणार. पण त्याने फार पाठिंबा दिला”.

“मला माहित होतं की मला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. मी म्हटल्याप्रमाणे, हे माझ्यासाठी शिकण्याचा अनुवव होता. माझ्यासाठी ही एक संधी आहे. म्हणून, मी त्याच्याकडून शक्य तितकं शिकेन. कारण प्रत्येक भूमिकेत त्याच्यासारखा अनुभव आणि कल्पना कोणाकडेही नाहीत. मग ती फलंदाजी असो, एक व्यक्ती म्हणून असो आणि कर्णधार म्हणून असो,” असं पाटीदार म्हणाला.

ज्या दिवशी आरसीबी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं तो दिवस पाटीदारसाठी सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक होता. कोहलीकडून फलक स्वीकारताना आपल्याला काहीच सुचत नव्हतं असं तो म्हणाला.

“मी टीव्ही पाहण्यास सुरुवात केल्यापासून त्याला आयपीएलमध्ये, मैदानाबाहेर पाहत आहे. त्याच्याकडून कर्णधारपदाची पाटी घेणं हा वेगळा अनुभव होता. त्यानंतर, मी त्याच्याकडे असं पाहत होतो की, मी काय करावं? मग त्याने काही शब्द म्हटले, ‘तू ते पात्र आहेस, तू ते मिळवलेस’. त्यामुळे मला थोडे बरे वाटले,” असं त्याने सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!