Homeदेश-विदेशऔद्योगिक अपघात म्हणून कामाच्या वेळी लैंगिक संबंधात मृत्यूचे नियम नियमांचे नियम आहेत....

औद्योगिक अपघात म्हणून कामाच्या वेळी लैंगिक संबंधात मृत्यूचे नियम नियमांचे नियम आहेत. चीनमधील कायदेशीर खटल्याचा तपशील माहित आहे


कामादरम्यान मृत्यू: चीनमधील एका न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा जगभरामध्ये चर्चा आहे. येथील एका व्यक्तीचा कामाच्या तासादरम्यान प्रेयसीबरोबर सेक्स करताना मृत्यू झाला असता हा मृत्यू ‘इंडस्ट्रीअल अपघात’ असल्याचा निर्णय दिला आहे. प्रेयसीसोबत लैंगिक संबंध ठेवत असतानाच ड्युटी अवर्समध्ये मृत्यू झाल्याने या व्यक्तीच्या नातेवाईकांना कंपनीकडून नुकसानभरपाई घेण्याचा अधिकार असल्याचं न्यायालाने स्पष्ट केलं आहे.

नेमकं घडलं काय?

मृत व्यक्तीचे नाव झांग असं असून तो 60 वर्षांचा होता, असं ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. झांग हा बीजिंगमधील एका छोट्या कारखान्यात सुरक्षा रक्षक होता. झांग हा आठवड्याचे सातही दिवस 24 तास काम करत होता आणि त्याला सुट्टीही दिली जात नव्हती. विशेष म्हणजे सुरक्षेची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. कामाच्या या परिस्थितीमुळे, मृत व्यक्ती स्वतः वयस्कर असल्यानेही नोकरी सोडू शकत नव्हता. त्याला मोकळा वेळच मिळायचा नाही. म्हणूनच तो सुरक्षा कक्षात मैत्रिणीला भेटायचा. त्यापैकी भेटीत दोघांनी लैंगिक संबंध ठेवले आणि त्याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

मुलाने दाखल केला भरपाईसाठीचा खटला

पोलिस तपासात झांगचा मृत्यू नैसर्गिक असून त्याच्यासोबत कोणताही घातपात झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने झांगचा मुलगा झांग शिओशीने म्युनिसिपल सोशल सिक्युरिटी ब्युरोच्या कायदेशीर विभागामार्फत औद्योगिक अपघाताअंतर्गत वडिलांच्या मृत्यूच्या मोबदल्यात भरपाई मिळावी यासाठी दावा केला. वडिलांचा मृत्यू कामाच्या वेळेत आणि त्याच्या नियुक्त केलेल्या कामाच्या ठिकाणी झाला असल्याने आम्ही नुकसानभरपाईसाठी पात्र आहोत, असा युक्तिवाद झांग यांच्या मुलाने केला होता. हा मृत्यू खाजगी प्रकरणादरम्यान झाला होता म्हणून तो कामाशी संबंधित नव्हता असं म्हणत सुरुवातीला अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळेच 2016 मध्ये, झांग शिओशीने कारखाना आणि सामाजिक सुरक्षा प्राधिकरणाविरुद्ध खटला दाखल केला. माझे वडील नेहमीच कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असायचे. त्यामुळे त्यांनी केलेले कोणतेही कृत्य जरी ते स्वतःसाठी असले तरी ते करणं अपरिहार्य होतं असं झांग शिओशीने सांगितलं. म्हणजेच माझे वडील 24 तास नोकरीवर असल्याने खासगी प्रकरणादरम्यान झालेला मृत्यू म्हणून त्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं मुलाने केलेल्या दाव्यात नमूद केलं.

न्यायालयाने निकालात काय म्हटलं?

न्यायालयाने अखेर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर या प्रकरणात झांग शिओशीच्या बाजूने निकाल दिला. झांग सिनियर यांचे कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत निधन झाले होते आणि त्यांच्यावर सर्व सुरक्षा आणि काम अवलंबून असल्याने ते नोकरी सोडू शकत नव्हते, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळेच हा मृत्यू कामाशी संबंधित होता, असं न्यायालयाने म्हटलं. या निकालाविरुद्ध कारखाना आणि सामाजिक सुरक्षा ब्युरोनेही आक्षेप घेत विरोध दर्शवणारा अर्ज केला. मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवला. फेब्रुवारी 2017 मध्ये, सामाजिक सुरक्षा ब्युरोने अधिकृत कागदपत्रात झांग यांच्या मृत्यूचे ‘औद्योगिक अपघात’ म्हणून वर्गीकरण केल्याची माहिती दिली. परंतु कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम यावेळेस उघड करण्यात आली नाही.

निकालात हे दोन घटक महत्त्वाचे ठरले

खूप जुन्या प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा चिनी माध्यमांने विशेष लक्ष का दिले आहे याबद्दलचं कोणतंही ठोस कारण सध्या उपलब्ध नाही. चोंगकिंग येथील वकील चेन रुई यांनी या निकालाचं विश्लेषण करताना न्यायालयाच्या निर्णयात दोन प्रमुख घटक कोणते हे सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे झांग यांचे कामाचे वेळापत्रक हे 24 तासांचं होतं. याच कालावधीमध्ये त्यांना वैयक्तिक कामं करावी लागायची. ज्यामध्ये प्रेयसीला भेटणे, जेवण करणे, जेवण खाणे किंवा शौचालय वापरण्यासारख्या गोष्टींचा समावेश होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मृत्यू झाला तेव्हा झांग हे कंपनीच्या नियमाप्रमाणे कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नव्हते. ते त्यांच्या जोडीदारासोबत असल्याने त्यांचे वर्तन सामाजिक नियमांच्या विरुद्ध मानले गेले नाही.

मर्यादा निश्चित करणं आवश्यक

सध्या हा असामान्य खटला आणि निकाल चिनी सोशल मीडियाबरोबरच जगभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कामगार हक्क, कामाच्या परिस्थिती आणि वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक कर्तव्यांमधील विभाजन करणाऱ्या मर्यांदावर या खटल्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!