Homeमनोरंजनआयपीएल 2025 मुंबई इंडियन्स रोहित शर्मा फक्त फलंदाजी करत नाही का?

आयपीएल 2025 मुंबई इंडियन्स रोहित शर्मा फक्त फलंदाजी करत नाही का?


आयपीएल 2025 चा हंगाम सुरु झाला तेव्हा रोहित शर्माच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या. पण जसजशी आयपीएल स्पर्धा पुढे सरकत आहे तसतसा रोहित शर्मा फॉर्मात येत असून, धावा कुटत आहे. रोहित शर्माने 10 सामन्यांमध्ये 293 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र तुफान फलंदाजी कऱणारा रोहित शर्मा मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही. त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त वापर होताना दिसतो. मुंबई इंडियन्स आता पुढील सामना गुजरातसोबत खेळणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) रोहित शर्माला (Rohit Sharma) इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त का खेळवलं जात आहे याचा खुलासा केला आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामात बहुतेक वेळा रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. फक्त 2 ते 3 ओव्हर तो क्षेत्ररक्षण करताना दिसतो. मात्र फलंदाजीला तो आघाडीला खेळण्यासाठी उतरतो. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत महेला जयवर्धने याने रोहित शर्माला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळवण्याचा निर्णय हंगामाच्या सुरुवातीला घेण्यात आला नव्हता असं स्पष्ट केलं. तसंच भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार एका अडचणीत सापडला होता; म्हणूनच त्याचा वापर इम्पॅक्ट सब म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला असंही त्याने स्पष्ट केलं.

“नाही हे सुरुवातील असं नव्हतं. नक्कीच रोहित काही सामन्यात क्षेत्ररक्षण करत होता. पण जर तुम्ही संघाची बांधणी पाहिलीत तर अनेक खेळाडू दुहेरी भूमिका निभावत आहेत. यापैकी अनेकजण गोलंदाजी करत आहेत. त्याचवेळी काही मैदानात वेगवान खेळाडूंची गरज असते,” असं महेला जयवर्धनेने सांगितलं.

“तुम्हाला वेगवान खेळाडूंची गरज असते. त्यामुळे खेळात तेदेखील महत्त्वाचं असतं. दुसरीकडे रोहित शर्माही चॅम्पिअन्स ट्रॉफीतील दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त दबाव आणू नये अशी आमचा प्रयत्न आहे. फलंदाजी महत्त्वाची असल्याने आम्ही ते करण्यात यशस्वी झालो आहेत,” असं महेला जयवर्धनेने सांगितलं.

रोहित शर्मा पूर्णपणे सक्रीय

रोहितला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवणं हा कोणताही अडथळा नाही, कारण तो डगआउटमधून आपलं मत देत राहतो आणि खेळाभोवतीच्या चर्चेत सतत सहभागी असतो असंही त्याने सांगितलं. “मैदानात किंवा मैदानाबाहेर असतानाही तो त्याचं योगदान देत राहतो. सतत संवाद होत असतो. सक्रीयपणे त्याचा सहभाग असतो,” असं तो म्हणाला.

“पण सामन्यात आवश्यक असलेले सर्व गोलंदाजी पर्याय आमच्याकडे आहेत याची खात्री करण्यासाठी एकंदर नियोजन करणं पुरेसे आहे. आणि आमच्याकडे बरेच वरिष्ठ खेळाडू देखील आहेत. त्यांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता जास्त असते (एकतर सूर्या किंवा तिलक किंवा असाच कोणीतरी, डोमेस्टिक फलंदाज). त्यामुळे माझ्यासाठी हा एक कठीण पर्याय आहे. पण तो असणे ही डोकेदुखी चांगली आहे,” असं तो पुढे म्हणाला.

मुंबई इंडियन्स सध्या 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर मंगळवारी त्यांनी गुजरातचा पराभव केला तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जातील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!