Homeदेश-विदेशकर्नाटकातील 10 व्या एचएससी परीक्षेत त्यांचा मुलगा अयशस्वी झाल्यानंतर पालक साजरा करतात

कर्नाटकातील 10 व्या एचएससी परीक्षेत त्यांचा मुलगा अयशस्वी झाल्यानंतर पालक साजरा करतात


आपल्या मुलाने खूप शिकावं आणि प्रत्येक परीक्षेत अव्वल यावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांचं भविष्य उज्वल होण्याच्या हेतूने त्यांच्यासाठी सर्वोत्तम शाळा, कॉलेज निवडले जातात. इतकंच नाही तर शाळेव्यतिरिक्त इतर क्लासेसही लावले जातात. त्यामुळेच मूल जेव्हा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतं तेव्हा पालकांना आपल्या सगळ्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. पण जर हेच मूल नापास झालं तर मात्र सगळी मेहनत वाया गेली अशी खंत करत राहतात. पण कर्नाटकमध्ये याउलट चित्र पाहायला मिळालं. मुलगा दहावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आई-वडिलांनी सेलिब्रेशन करत आनंद साजरा केला.

कर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले. तो सर्व सहा विषयांमध्ये नापास झाला. त्याला दहावीच्या परीक्षेत फक्त 32 टक्के मिळाले. मुलाचा निकाल निराशाजनक असला तरी तो जगाचा काही अंत नाही अशीच भावना या आई-वडिलांची होती. आपल्या मुलाची हार न मानण्याची प्रवृत्ती त्यांच्यासाठी आशेचा किरण होती.

एकीकडे परीक्षेत नापास झाला म्हणून मित्र खिल्ली उडवत असताना, त्याचे पालक मात्र पाठीशी उभे राहिले. नापास झाल्याबद्दल मुलाला ओरडण्याऐवजी किंवा त्याला खोलीत कोंडून ठेवत निऱाशा व्यक्त करण्याऐवजी पालकांनी केक कट करुन आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मुलाचा उत्साह कायम राहिला.

पालकांनी मुलाला सांगितलं की, “तू परीक्षेत नापास झाला असलास, तरी आयुष्यात नाही. तू नेहमीच नव्याने प्रयत्न करु शकतोस आणि पुढील प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस”. अपयश मिळूनही आई-वडील पाठीशी उभे राहिल्याने अभिषेकला भावना अनावर झाल्या होत्या. तो म्हणाला, “मी परीक्षेत नापास झालो असलो, तरी कुटुंबाने प्रोत्साहन दिलं. मी पुन्हा एकदा परीक्षा देईन, उत्तीर्ण होईन आणि आयुष्यात यशस्वी होईन”.

उद्या HSC चा निकाल

सोमवारी 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!