Homeमनोरंजनआयपीएल 2025 राजस्थान रॉयल्स हरले

आयपीएल 2025 राजस्थान रॉयल्स हरले


कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) वि राजस्थान रॉयल्स (आरआर), आयपीएल 2025: आयपील 2025 च्या 53 वा सामना जबरदस्त रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाताने राजस्थान रॉयल्सला फक्ता एका धावेने पराभूत केलं. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात झालेल्या या सामन्यात कोलकाताने राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान उभं केलं होतं. राजस्थान रॉयल्स संघ मात्र 8 विकेट्स गमावून 205 धावाच करु शकला. सध्याच्या आयपीएल हंगामातील कोलकाताचा हा पाचवा विजय ठरला. तर दुसरीकडे राजस्थानने 12 पैकी 9 सामने गमावले आहेत. राजस्थान संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आधीच संपल्या आहेत.

अखेर ओव्हरचा थरार

राजस्थान संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. वैभव अरोराने या ओव्हरमध्ये शुभम ओव्हरला दोन षटकार आणि एक चौकार लगावून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना वैभव कमाल करेल असं वाटत होतं. पण वैभव मोठा फटका खेळू शकला नाही आणि दुसऱी धाव घेताना जोफ्रा आर्चर धावबाद झाला. राजस्थानचा कर्णधार रियान परागने तुफान फटकेबाजी करत 95 धावा केल्या,. पण त्याची खेळी वाया गेली.

कशी होती अखेरची ओव्हर –

पहिला चेंडू – 2 धावा
दुसरा चेंडू – 1 धाव
तिसरा चेंडू – 6 धावा
चौथा चेंडू – 4 धावा
पाचवा चेंडू- 6 धावा
सहावा बॉल- 1 धावा + विकेट

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 206 धावांचा डोंगर उभा केला होता. नरेन स्वस्तात बाद झाल्याने कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. गुरबाज (35), रहाणे (30) आणि रघुवंशी (44) मोठी खेळी करु शकले नाहीत. यानंतर पाचव्या क्रमांकावर रसेलला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. रसेलने तुफान फटकेबाजी करत 57 धावा केल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या 200 च्या पुढे गेली. रसेल आणि रघुवंशीने 61 धावांची भागीदारीक केली. रिंकू सिंगने 19 धावा केल्या.

पॉईंट टेबलची काय स्थिती?

आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. वैभव सूर्यवंशी पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. पदार्पण करणाला कुणालही लवकर आऊट झाला. यशस्वी आणि कर्णधार रियानने तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. यशस्वी 34 धावांवर बाद झाला.

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने ध्रुव आणि वानिंदू यांनी शून्यावर बाद करत राजस्थानला जोरदार धक्के दिले. यामुळे राजस्थानची स्थिती 71 धावांवर 5 गडी बाद झाली. रियान आणि शिमरॉन हेटमायर यांनी 92 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणलं होतं. हेटमायर 29 धावांवर बादझाला. रियान पराग मात्र एकतर्फी किल्ला लढवत होता. त्याने एका ओव्हरमध्ये सलग 5 षटकारही लगावले. पण 95 धावांवर तो बाद झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!