सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान लढाई: भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सगळ्यात जास्त बघितला जाणारा सामना असतो. या सामन्याची लोक आतुरतेने वाट बघत असतात. पण 2011 साली एक असा सामना झाला ज्याची आठवणही लोकांना नको वाटते. त्यासाली भारत आणि पाकिस्तानमध्ये एक रक्तरंजित हॉकी सामना झाला होता. हॉकीच्या जगात कुप्रसिद्ध असलेल्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांचे जीवघेणे शत्रू बनले होते. भारतीय हॉकी संघ हा तिरंगी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. त्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, या मालिकेतील तिसरा संघ ऑस्ट्रेलिया होता. सामना संपायला फक्त 2 मिनिटे शिल्लक असताना, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये हॉकीच्या मैदानावर युद्ध सुरू झाले.
रद्द झाला होता सामना
हॉकीच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील हा वाद एवढा वाढला की अखेरीस सामना रद्द करण्यात आला. या सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जबरदस्त मारामारी झाली. एवढंच नाही तर भारतीय हॉकी खेळाडू गुरबाज सिंगचे डोक्याला जबरदस्त दुखापत झाली. या घटनेनंतर गुरबाज सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या मारामारीनंतर खूप गोंधळ झाला आणि सामना रद्द करण्यात आला. भारताविरुद्ध 0-3 ने पिछाडीवर राहिल्यानंतर, पाकिस्तानने पुनरागमन केले आणि हाफ टाइमपर्यंत स्कोअर 2-3 ने केला.
हे ही वाचा: Mary Kom Divorce: मेरी कोमने पतीपासून घेतला घटस्फोट, अफेअरच्या अफवांचे केले खंडनसामना संपण्याच्या सुमारे दोन मिनिट आधी घडली घटना
सामना संपण्याच्या सुमारे दीड-दोन मिनिट आधी, पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याने 3-3 अशी बरोबरी साधली. तेवढ्यातच पाकिस्तानचा सय्यद इम्रान शाह आणि शफकत रसूल यांचा भारताच्या गुरबाज सिंग आणि इतर हॉकी खेळाडूंशी वाद झाला. हा वाद एवढा वाढला की दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मारामारी झाली. भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंनी बुक्के आणि हॉकी स्टिकचा कसलाही वापर न करता भरपूर वापर केला. यादरम्यान पाकिस्तानच्या सय्यद इम्रान शाह आणि शफकत रसूल यांनी गुरबाज सिंगवर हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचे डोके फ्रॅक्चर झाले.
हे ही वाचा: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला दाखवून दिली आपली जागा; म्हणाला, ” आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही…”
गुरबाज सिंगवरील हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय खेळाडूंनी सय्यद इम्रान शाह आणि शफकत रसूल यांना जखमी केले. काही मिनिटातच हा सामना रक्तरंजित झाला. घडत असलेली घटना बघून तो रद्द करावा लागला. नंतर, पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक ख्वाजा जुनैद यांनीही भारतीय चाहत्यांवर निराधार आरोप केले. भारत आणि पाकिस्तानमधील तो सामना हॉकीच्या जगात कुप्रसिद्ध झाला.
































