Homeदेश-विदेशUPSC Topper Tips: भारतातून पहिली आलेली शक्ती किती तास करायची अभ्यास? टॉपरचा...

UPSC Topper Tips: भारतातून पहिली आलेली शक्ती किती तास करायची अभ्यास? टॉपरचा सिक्रेट फॉर्मुला!


यूपीएससी टॉपर स्टोरी: एकेकाळी ‘IAS चा कारखाना’ म्हणून ओळखले जाणाऱ्या अलाहाबाद विद्यापीठाने पुन्हा एकदा नागरी सेवा परीक्षेत जोरदार पुनरागमन केल्यामुळे चर्चेत आहे. दशकांनंतर, प्रयागराजने 2025 च्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान मिळवले.  नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालात शक्ती दुबे यांनी ऑल इंडिया रॅंकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी देतात. त्यात काहींना यश मिळतं तर काहींना यश हुलकावणी देतं. पण शक्तीने यूपीएससीने टॉप केलंय. पण यासाठी शक्तीने कोणती स्टॅटर्जी वापरली जाणून घेऊया.

7 वर्षांची तयारी, 4 वेळा अपयश आणि शेवटी सुवर्ण यशाच्या इंद्रधनुष्यात विणलेल्या शक्तीने आयएएस-आयपीएस देणाऱ्या प्रयागराजचं नाव देशभरात पोहोचवलं. नागरी सेवा परीक्षा- 2024 मध्ये 2 गुणांनी अनुत्तीर्ण झाल्यानंतर आता सर्व काही संपलय, असे तिला वाटले. परंतु तिने हार मानली नाही. काही काळानंतर तिने नवीन उर्जेने ध्येयाकडे वाटचाल केली. ज्यामुळे तिला यश मिळाले. शक्ती दुबेने आपल्या यशाचं सिक्रेट सर्वांसमोर शेअर केलंय.  यावेळी मुलाखत गेल्या वर्षीपेक्षा चांगली झाली. मला प्रयागराज महाकुंभ, भारत-चीन आणि भारत-नेपाळ संबंधांवर प्रश्न विचारण्यात आले. माझ्या आवडी आणि चालू घडामोडींशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीसाठी मी स्वतःला अपडेट ठेवले आणि माझे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याचा सराव केला होता, असे शक्ती सांगते. माझी तयारी एकांतात झाली. माझे फार मोठे मित्रमंडळ नव्हते. मी स्वतःला पुस्तके, शिक्षक आणि कुटुंबाच्या मार्गदर्शनापुरते मर्यादित ठेवले. फाउंडेशन कोर्सनंतर जेव्हा मी शिक्षकांच्या संपर्कात आले, तेव्हा मला समजले की योग्य मार्गदर्शन ही यशाची गुरुकिल्ली आहे, असेही शक्तीने पुढे सांगितले. शक्तीचा हा पाचवा प्रयत्न होता आणि ती त्या 7 वर्ष तयारी करत होत्या. प्रत्येक अपयशानंतर, मी माझी चूक ओळखली आणि पुढच्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित केले. तुम्हाला तुमच्या कमकुवतपणा स्वीकाराव्या लागतील, तरच तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकाल, असेही शक्तीने सांगितले.

मोबाईलचा वापर

कोणत्याही गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात. त्याचप्रमाणे मोबाईल देखील आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरला तर आज मोबाईल एक शस्त्र बनू शकतो. मी मोबाईल फक्त अभ्यास आणि चालू घडामोडींसाठी वापरला. स्पर्धकांनी फक्त अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करावा, अन्यथा लक्ष आणि वेळ दोन्ही वाया जातात, असा सल्ला तिने तरुणांना दिलाय.

विषय आवडीनुसार निवडा

आता प्राथमिक परीक्षेसाठी 30 दिवस उरले आहेत. अशा वेळी नवीन काहीही वाचण्याची गरज नाही. तुम्ही जे वाचले आहे त्याचा सराव करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मानसिक ताकद टिकवून ठेवा. मी सरासरी 14 तास अभ्यास करायचे आणि नेहमीच अभ्यासक्रमात खोलवर जाण्याचा प्रयत्न करायचे, असे शक्तीने सांगितले. मी यूपीएससीमध्ये माझा पर्यायी विषय म्हणून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध निवडले. हा विषय ट्रेंड पाहून नव्हे तर आवडीनुसार आणि समजुतीनुसार निवडला पाहिजे. यामुळे अभ्यासात खोली वाढते, असे शक्तीने सांगितले.

इच्छा खरी असेल तर मार्ग स्वतःच तयार

जेव्हा निकाल लागला आणि मला कळले की मी टॉपर झालीय तेव्हा सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही. मग मला खात्री झाल्यावर मी  माझ्या वडिलांना फोन केला. बाबा काही वेळ गप्प राहिले. मग म्हणाले पुन्हा एकदा सांग, काय झालंय? मी हा क्षण कधीही विसरू शकत नाही. सात वर्षांच्या संघर्ष, आत्मनिरीक्षण, अपयश आणि नंतर यशाच्या या प्रवासाने हे दाखवून दिलंय की जर इच्छा खरी असेल तर मार्ग स्वतःच तयार होतो, असे शक्तीने सांगितले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर..

दहशतवाद ही भारतासाठी सर्वात मोठी समस्या आहे. विशेषतः सीमापार दहशतवाद. सरकार दहशतवादाविरुद्ध चांगले काम करतंय पण आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. पहलगाम हल्ल्याची बातमी वाचून मला खूप वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया शक्ती दुबेने दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!