साधा अली महागडे हल्ला: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारताचे समर्थन केले आहे. हा क्रिकेटपटू म्हणजे बासित अली हा आहे. त्यांने स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून जनतेसमोर गोळ्या घालाव्यात.
‘माझा धर्म म्हणतो की…’
बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करत अनेक गोष्टी बोलल्या आहेत. बासितने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ” काल काश्मीरमध्ये एक खूप मोठी घटना घडली. 26 लोक शहीद झाले आणि हा एक मोठा अत्याचार आहे. मला माफ करा, पहलगाममध्ये हल्ला झाला आहे हे मला माहित नव्हते. कोणीही असो, कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, हेच माझा धर्म सांगतो. माझा धर्म म्हणतो, ख्रिश्चन असो, यहूदी असो, हिंदू असो किंवा जाट असो, कोणालाही हे करण्याचा अधिकार नाही. जो कोणाचा जीव घेतो तो मुस्लिम असू शकत नाही. ”
हे ही वाचा: “अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल…”; ट्रोलिंगनंतर नीरज चोप्राचं स्पष्टीकरण
“मलाही फाशी द्या…”
” ही खूप दुःखद बातमी आहे आणि माझ्या सबस्क्राइबर्सच्या आणि आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने, आम्ही प्रभावित झालेल्या आणि ज्यांचे प्रियजन शहीद झाले त्या सर्व कुटुंबांना शोक व्यक्त करतो. मी असेही ऐकले आहे की बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. आजच्या सामन्यात आवाज आणि गाणी वाजणार नाहीत का? ही खूप चांगली गोष्ट आहे.” ज्यांनी हे केले आहे, त्यांना माफ केले जाऊ नये असे बासित अली आत्मविश्वासाने म्हणाला.” जर मी हे केले असते तर मला फाशी द्यायला हवी. माझ्या इस्लाममध्ये असे लिहिलेले नाही की, मी कोणालाही मारावे.”
हे ही वाचा: Pahalgam Terror Attack: ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला पुढच्या वर्षी खेळायचं आहे IPL मध्ये, पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेत आलं वक्तव्य
https://www.youtube.com/watch?v=7fyciqtprng
हे ही वाचा: यंदा कर्तव्य आहे? IPL 2025 नंतर शुभमन गिल लग्न करणार? कोलकाता विरुद्धच्या सामन्यात केलं मोठं व्यक्तव्य
‘काहीही हरकत नाही… त्यांना जनतेसमोर गोळ्या घाला’
बासित पुढे म्हणाले, ‘हे निष्पाप लोक त्यांच्या सुट्टीसाठी गेले होते. असे काय काळ आला, असे काय झाले आहेत की त्यांना हे कळत नाही की त्यांचेही एक कुटुंब आहे. ज्याने हे केले आहे, मी अल्लाहला प्रार्थना करतो आणि प्रत्येक नमाजात प्रार्थना करेन की, त्याच्या कुटुंबासोबतही हे घडायला हवे. ही खूप वाईट बातमी आहे, यात जो कोणी सामील असेल त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नये. त्याला जनतेसमोर गोळ्या घालून ठार मारले पाहिजे.”






























