HomeमनोरंजनDehydration symptoms thirsty is not only sign know how your body indicate...

Dehydration symptoms thirsty is not only sign know how your body indicate you; फक्त तहान लागणे एवढंच नाही, Dehydration ची आणखी काही लक्षणे; दिसताच व्हा सावधान


उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि जास्त घाम येणे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते ज्यामुळे डिहायड्रेशन होते. यामुळे आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. म्हणून, डिहायड्रेशनची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. तहान लागण्याव्यतिरिक्त डिहायड्रेशनची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. या दरम्यान जर शरीरातील पाणी कमी झाले तर Dehydration ची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे शरीराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

जर लोक डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणे, इतकंच समजत असाल तर याचे इतर लक्षणे देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे Dehydration च्या इतर लक्षणांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

डिहायड्रेशनची इतर लक्षणे

तोंड आणि त्वचेचा कोरडेपणा
डिहायड्रेशनची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे कोरडे तोंड आणि खडबडीत त्वचा. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा लाळेचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडते. तसेच, त्वचेची लवचिकता कमी होते आणि ती कोरडी होते.
डोकेदुखी आणि चक्कर येणे

थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

पाण्याअभावी शरीराची ऊर्जा पातळी कमी होते, ज्यामुळे कोणतेही कठोर परिश्रम न करता थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. लहान-लहान कामे करतानाही आळस वाटू लागतो.

स्नायू पेटके

डिहायड्रेशनमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम) चे संतुलन बिघडते, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके किंवा वेदना होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे ही समस्या वाढते.

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

मेंदूचा सुमारे ७५% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास लक्ष केंद्रित कमी होते, चिडचिड वाढते आणि विचार करण्याची क्षमता देखील प्रभावित होऊ शकते.

खूप भूक लागणे

बऱ्याचदा तहान भूक समजली जाते. जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज असू शकते.

हृदयाचे ठोके वाढणे

पाण्याअभावी रक्ताचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हृदयाला जास्त काम करावे लागते आणि हृदयाचे ठोके वाढतात.

डिहायड्रेशन कसे टाळावे?

भरपूर पाणी प्या – दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
इलेक्ट्रोलाइट पेये घ्या – नारळ पाणी, ओआरएस किंवा लिंबू पाणी पिऊन इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढा.
फळे आणि भाज्या खा – टरबूज, काकडी, संत्री यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
कॅफिन आणि अल्कोहोल टाळा – ते डिहायड्रेशन वाढवू शकतात.
जास्त उन्हात जाणे टाळा – उन्हाळ्यात सावलीत रहा आणि हलके कपडे घाला.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!