Homeमनोरंजनआयपीएल 2025 राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनने राहुल ड्रॅव्हिड्स टीम हडलकडे दुर्लक्ष केले

आयपीएल 2025 राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनने राहुल ड्रॅव्हिड्स टीम हडलकडे दुर्लक्ष केले


IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2025 च्या सामन्यात फक्त 19 चेंडूत 31 धावा केल्यानंतर संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे बाहेर बसावं लागलं. राजस्थानसमोर 188 धावांचं आव्हान असताना हा सामना ड्रॉ झाला. मात्र दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये, राजस्थानने फॉर्ममध्ये असलेल्या नितीश राणाला वगळलं आणि त्याऐवजी यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग यांना पाठवलं.

यादरम्यान आता, सोशल मीडिया युजरने पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, राजस्थान रॉयल्सचं वरिष्ठ संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, साईराज बाहुतुले यांच्यासह सुपर ओव्हरच्या आधी चर्चा करत आहे. त्याच व्हिडिओमध्ये सॅमसनही दिसत आहे. मात्र तो चर्चेत सहभागी न होता अवतीभोवती फिरताना दिसत आहे. संजू तणावात किंवा आपल्या विचारांमध्ये मग्न असल्याचं असू शकतं. पण अनेक नेटकऱ्यांनी संघात काही फूट आहे का? अशी संका व्यक्त केली आहे. चर्चेदरम्यान एक खेळाडू सॅमसनला काहीतरी बोलताना दिसत आहे, पण तो इशारा करत निघून जातो.

बुधवारी रात्री अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2025 मधील पहिल्या सुपर ओव्हरसाठी नितीश राणा राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांपैकी एक असेल अशी अपेक्षा होती. पण 28 चेंडूत 51 धावा करूनही, राणाला न पाठवण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याऐवजी शिमरॉन हेटमायर, रियान पराग आणि नंतर यशस्वी जैस्वाल यांना प्राधान्य देण्यात आलं. पण राजस्थानची ही रणनिती अपयशी ठरली. राजस्थान संघ 5 चेंडूत फक्त 11 धावा करु शकला ज्यामध्ये दोन रन आऊट होते.

नाट्यमय सामन्याच्या समारोपावेळी राणा म्हणाला की, मैदानावरील सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाच्या हातात आहेत. “हा कधीच एका व्यक्तीचा निर्णय नसतो. हा नेहमीच व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफ  यांचा असतो. कारण ते या गोष्टींवर चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. मला असे वाटते की जर हा निकाल आमच्या बाजूने लागला असता, तर प्रश्न वेगळा असता. त्यामुळे क्रिकेटचा हा खेळ निकालावर आधारित आहे.,” असं त्याने म्हटलं.

“व्यवस्थापन हे ठरवते. दोन वरिष्ठ खेळाडू आणि कर्णधार आहेत. मला वाटते, तो निर्णय योग्य होता. हेटमायरने दोन षटकार मारले असते तर तुम्ही हाच प्रश्न विचारला नसता. हेटमायर हा आमचा फिनिशर आहे. सगळ्यांना हे माहीत आहे आणि त्याने भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आम्ही आणखी लक्ष केंद्रीत करु शकतो,” असं मत त्याने मांडलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!