Homeमनोरंजनकोच गौतम गंभीर यांच्याशी वाद झाला असे रोहित शर्मा यांनी सांगितले की...

कोच गौतम गंभीर यांच्याशी वाद झाला असे रोहित शर्मा यांनी सांगितले की सिडनी कसोटीतून तो का बाहेर काढतो

क्रीडा : कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) सिडनी कसोटी सामना आपण का खेळलो नाही यावर अखेर भाष्य केलं आहे. संघाच्या भल्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता असं त्याने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) याच्या Beyond23 Cricket Podcast मध्ये रोहित शर्माने सामन्याआधी आपली प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीचा प्रमुख आजित आगरकर (chairman of selectors Ajit Agarkar) यांच्याशी चर्चा झाली होती असा खुलासा केला. आपण सिडनी कसोटी सामना खेळणार नसल्याचं कळवल्यानंतर त्यावर विरोधी मतं होती असंही त्याने सांगितलं. रोहित शर्माने 15 डावात त्याने 10.83 च्या सरासरीने फक्त 164 धावा केल्या होत्या. दरम्यान भारताने गेल्या दशकात पहिल्यांदाच बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पराभवाचा सामना केला.

स्वत:ला संघातून वगळण्याच्या निर्णयावर रोहित म्हणाला की, सिडनीमधील सामना गमावला असल्याने मालिकेचा निकाल ठरवणारा सामना माझ्याऐवजी शुभमन गिलने खेळावा अशी इच्छा होती. “सिडनीमधील अखेरच्या कसोटी सामन्यात मी स्वत:शी प्रामाणिक असणं गरजेचं होतं. मी चेंडू नीट टोलवत नव्हतो. आमच्याकडे बरेच खेळाडू होते संघर्ष करत होते, या कारणामुळे मला तिथे ठेवायचं नव्हतं. जेव्हा तुम्ही स्वतःला तिथे जोडता तेव्हा ते थोडे अधिक होते. आमची गिलने खेळावे अशी इच्छा होती. तो खूप चांगला खेळाडू आहे. तो मागील कसोटीत मुकला होता,” असं रोहित म्हणाला.

“मी म्हणालो होतो, ‘ठीक आहे, जर मी चेंडू नीट टोलवत नसेन तर ही आताची वेळ आहे.’ दहा दिवसांनी, पाच दिवसांनी परिस्थिती बदलू शकते. मी प्रशिक्षक आणि निवडकर्त्याशी बोललो, जे दौऱ्यावर होते. ते काहीशी सहमत होते, नव्हते. त्याभोवती वाद झाला. तुम्ही संघाला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करा आणि संघाला काय हवे आहे ते पहा आणि त्यानुसार निर्णय घ्या. कधीकधी ते हिताचं ठरु शकतो, कधीकधी ते ठरत नाही. असंच हे सुरु असतं,” असं तो पुढे म्हणाला.

जेव्हापासून मी कर्णधारपद स्वीकारलं आहे, तेव्हापासून माझं लक्ष वैयक्तिक ध्येयांपेक्षा संघाला प्राधान्य देण्यावर आहे असं रोहितने स्पष्ट केलं.

“तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात यशाची हमी दिली जात नाही. मी फक्त माझ्यासाठीच नाही तर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून, मला असे वाटत होते की इतर खेळाडूंनीही असाच विचार करावा. त्यांनी संघाला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करावा आणि संघासाठी आवश्यक ते करावे आणि ‘माझ्या धावा, माझे गुण’ आणि अशा गोष्टींबद्दल जास्त काळजी करू नये. हे महत्वाचे आहे कारण तुम्ही सांघिक खेळ खेळत आहात,” असं रोहितने निदर्शनास आणून दिले. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!