Homeदेश-विदेशट्रेंडिंग न्यूज Google कर्मचार्‍यांना येथे काहीही न केल्याबद्दल पैसे देत आहे का...

ट्रेंडिंग न्यूज Google कर्मचार्‍यांना येथे काहीही न केल्याबद्दल पैसे देत आहे का हे माहित आहे

Google जॉब ट्रेंडिंग बातम्या: दर दिवशी, क्षणाक्षणाला असंख्य मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याच्या बळावर, आपल्या शिक्षणाला, कौशल्याला आणि प्रामाणिकपणाला न्याय देईल अशा नोकरीच्या शोधात असतात. मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या एक  ना अनेक संधी आणि तितक्याच बहुविध क्षेत्रात करिअर करण्याच्या नव्या वाटा तयार झाल्या आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची यामध्ये सरशी पाहायला मिळत आहे. त्यातच झालेली क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअर इंटेलिजेन्स (AI).

Google कडूनही AI चा सर्वतोपरी वापर केला जात असून, त्याचे नवनवीन वर्जन लाँच केले जात आहेत. अनेक ठिकाणी मानवी योगदानाची जागा या एआयनं घेतली आहे. याच वाटचालीमध्ये Google नं थक्क करणारं आणखी एक पाऊल उचललं आहे. सध्या गुगल कर्मचाऱ्यांना कोणतंही काम न करण्याचं काम देत आहे. आश्चर्य वाटत आहे ना? इथं कंपनीला एक सामंजस्य करार अपेक्षित आहे.

कामच करायचं नाही, हेच तुमचं काम….

Google ही कंपनी सोडल्यानतंर कर्मचाऱ्यांनी एका निश्चिर काळासाठी त्यांच्याशी थेट स्पर्धेत असणाऱ्या कोणत्याही कंपनीमध्ये काम न करणं अशी कंपनीची अपेक्षा आहे. या प्रक्रियेत एका कराराअंतर्गत कर्मचाऱ्यांना रितसर पगार मोजला जाईल, पण असं करत असताना मात्र या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याची परवानगी मात्र नसेल. काही प्रकरणांमध्ये हा काळ वर्षभराचाही असू शकतो.

काम न करता पैसे मिळणं हे अनेकांचच स्वप्न असलं, एक कल्पना असली तरीही प्रत्यक्षात असं होणं AI संशोधकांच्या करिअरवर परिणाम करणारं पाऊल ठरत आहे. मायक्रोसॉफ्टच्या AI चे उपाध्यक्ष आणि डीपमाईंडचे माजी कर्मचारी नांडो डी फ्रीटास यांनी X च्या माध्यमातून हा मुद्दा उजेडात आणत अनेकदा कर्मचारी आपल्याशी संपर्क साधून या परिस्थितीत नेमकं काय करणं अपेक्षित आहे, गुगलचे हे करार नेमके कसे नाकारायचे, इथपासून त्यांच्याकडे नोकरीच्या काही संधी आहेत का? इथपर्यंतचे प्रश्नही विचारतात. करिअरमध्ये न थांबता पुढे जाण्यासाठीचा हाच मार्ग अनेकजण सध्या निवडताना दिसत आहेत.

अनेकदा बहुतांश संस्था नोकरकपात किंवा तत्सम निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांकडून Contract वर सही करून घेतता. यामध्ये बऱ्याच छुप्या अटींचीसुद्धा नोंद केलेली असते. त्यामुळं नोकरी स्वीकारताना ज्याप्रमाणं कर्मचारी सतर्क असतात त्याचप्रमाणं नोकरी सोडतानासुद्धा त्यांनी सतर्क राहणं अपेक्षित आहे. अन्यथा करारबद्ध झाल्यास करिअरच्या वाटेत अडचणी आल्याच म्हणून समजा. (सौ.झीन्यूज)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!