Homeदेश-विदेशसनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयातून निकाली..

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयातून निकाली..

सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध; ‘हिंदु दहशतवादा’च्या षड्यंत्राचा पर्दाफाश

मुंबई – सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ ठरवून तिच्यावर बंदी घालण्यासाठी वर्ष २०११ मध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका अखेर मागे घेण्याची नामुष्की याचिकाकर्त्यांवर ओढवली. तब्बल १४ वर्षे चाललेल्या या न्यायालयीन संघर्षात, याचिकाकर्त्यांना संस्थेच्या विरोधात दहशतवादाचा एकही पुरावा सादर करता आला नाही. ‘‘याचिकेची सुनावणी घेण्यासाठी कोणताही आधार नाही. तुम्ही याचिका मागे घेता कि आम्ही ती फेटाळून लावू?’’, अशा कठोर शब्दांत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांना आपली याचिका बिनशर्त मागे घेतली. हा केवळ सनातन संस्थेचा विजय नसून, सत्य, न्याय आणि धर्मनिष्ठा यांचा विजय आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती, ती आज पुन्हा एकदा सत्यात उतरली. सर्वशक्तीमान भगवंत, न्यायदेवता, आमचे गुरु आणि या प्रकरणात आमच्या बाजूने लढणारे अधिवक्ते यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या निकालानंतर म्हटले आहे.
सनातन संस्थेच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा, अधिवक्ता अलौकीक पै आणि अधिवक्ता वसंत बनसोडे यांनी बाजू मांडली. गेल्या दीड दशकापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या ‘इकोसिस्टम’ने सनातन संस्थेला लक्ष्य करून ‘भगवा आतंकवादा’चा खोटा नॅरेटिव्ह रचला. वर्ष २००८ ते २०२५ या काळात सनातन संस्थेची झालेली अपरिमित हानी आणि हजारो निष्पाप साधकांना सोसावा लागलेला प्रचंड मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? या संपूर्ण काळात सनातन संस्थेने भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण संयमाने सर्व तपास यंत्रणांना सहकार्य केले. देशातील सर्वात मोठी राष्ट्रवादी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ज्याप्रमाणे खोटे आरोप करून बंदी घालण्यात आली, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न होता, जो न्यायदेवतेने हाणून पाडला आहे, असेही वर्तक म्हणाले.
सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून तिच्यावर बंदी घालावी, अशी मागणी सर्वप्रथम वर्ष २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केली, त्यानंतर काँग्रेसने ‘हिंदु दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करण्यासाठी आटापिटा केला; मात्र प्रत्येक वेळी सनातन संस्था निर्दोष सिद्ध झाली. वर्ष २००८ च्या गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणात सनातनला सर्वप्रथम गोवले; परंतु न्यायालयात सनातन संस्था निर्दोष ठरली. पुढे वर्ष २००९ मध्ये गोव्यात मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही काँग्रेस सरकारने सनातनला गोवले; या प्रकरणीही विशेष सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये सनातनचे निर्दोषत्व सिद्ध करत तपासयंत्रणांवर ताशेरेही ओढले. वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातनला लक्ष्य करून अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोही पुढे निष्फळ ठरला. हे सर्व खटले म्हणजे ‘हिंदु दहशतवाद’ सिद्ध करून सनातन संस्थेला संपवण्याच्या मोठ्या कटाचा भाग होता.
ईश्वराचे कार्य करणाऱ्या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काळाने (ईश्वराने) योग्य उत्तर दिले आहे. या कठीण काळातही सनातन संस्थेचे राष्ट्र, धर्म आणि समाजहिताचे कार्य अविरतपणे वाढतच असून नुकतेच सनातनने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. न्यायालयाने सनातनला निर्दोष मुक्त केले आहे; मात्र सनातन धर्मविरोधी प्रवृत्तींच्या विरोधातील अर्थात् या ‘इकोसिस्टम’च्या विरोधातील लढा अद्याप संपला नाही. हा लढा लढण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होण्याची गरज आहे, असेही श्री. अभय वर्तक म्हणाले.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!