Homeपुणे / पिंपरी-चिंचवडरस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, (ता.२४) : पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह पोलीस, महामार्ग प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, “पुणे जिल्ह्यात सध्या एकूण ४२ ब्लॅकस्पॉट असून त्यामध्ये पुणे मनपा क्षेत्रात १५, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतर्गत २२, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे २, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचा १ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील २ ब्लॅकस्पॉट आहेत. या सर्व ठिकाणी तातडीने लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात.”

या उपाययोजनांमध्ये दिशादर्शक फलक, बॅरिकेटिंग, राडारोडा साफसफाई, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग व वाहतूक प्रतिबंध यांचा समावेश असावा. “पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाने या उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करून पुढील एका महिन्यात अहवाल सादर करावा,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणांची माहिती संकलित करून ठिकाणनिहाय अपघाताची कारणमीमांसा करावी आणि त्या आधारे सुरक्षात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. खडकवासला धरण चौक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याचेही निर्देश देण्यात आले.

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही श्री. डूडी यांनी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता बहीर यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या कार्यवाहीचे संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!