Homeमहाराष्ट्रपुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री शिंदे...

पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत निर्णय

महाराष्ट्र (मुंबई, दि.२५) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. याशिवाय, फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठीही तितकाच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन आमदार विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला. या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कचऱ्याची सेंद्रिय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळखत प्रकल्प, खड्डा पद्धती आणि वैज्ञानिक वर्गीकरणाच्या उपाययोजना तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या डेपोची पाहणी करून नियोजनबद्धरीत्या काम सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

जांभूळवाडी तलावातील पाणी शुद्ध करून आंबेगाव खुर्द-बुद्रुक, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळीवाडे आणि गुजर निंबाळकरवाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या पाण्याची गुणवत्ता तपासून पुढील कारवाई करण्यात यावी, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

२३ गावांमध्ये वाढीव कर आकारणीबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे लक्षात घेऊन, त्या भागांतील थकीत करासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच या गावांमध्ये पायाभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले.

ग्रामपंचायतीमधून महापालिकेत समाविष्ट होताना सेवेतून कमी करण्यात आलेल्या ६२६ कर्मचाऱ्यांच्या सेवेत पुनर्भरणासाठी त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांना प्राधान्याने सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

या निर्णयांमुळे पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिकांच्या अनेक मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!