आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तयारीला लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील सेना भवन येथे शाखा प्रमुखांची बैठक पार पडली. शिवसेना सोडून गेलेल्य
?
मुंबई महापालिका हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मागील 20 ते 25 वर्षांपासून पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला जनाधार पाहता यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायच्या की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. त्यातच ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे या बैठकीतून दिसून आले.
शाखा प्रमुखांनी अंग झटकून कामाला लागावे
मुंबईतील शिवसेना भवनात रविवारी पक्षाच्या शाखा प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली. येत्या काळात शाखा प्रमुखांनी अंग झटकून कामाला लागावे. त्यासाठी दररोज 300 घरातील मतदारांची भेट घेण्याचे लक्ष्य ठेवावे. त्यानुसार दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे. त्यासोबतच पक्षाने केलेले काम या मतदारांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवावा. त्यामुळे निवडणूक काळातील सर्व कामे आतापासून पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना दिल्या आहेत.
सोडून गेलेल्यांना जागा दाखवण्याची वेळ
आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागण्याच्या सूचना करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले. शाखा प्रमुखांनी कामाचे नियोजन करीत असताना त्यांच्याकडील काही जबाबदारी शाखा समनव्यकाकडे पोहचवावी. त्यासोबतच प्रभागातील प्रत्येकाशी सर्वांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या मंडळींना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा…
बाळासाहेब गेल्यानंतर आम्हाला आपलेपण दिसले नाही:केंद्रीय मंत्रीपद जाधवांना देत एकनाथ शिंदेंनी मोठेपणा दाखवला- भरत गोगावले
बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत होते. बाळासाहेब ठाकरे यांची काम करण्याची जी काय पद्धत होती, ती उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला दिसून आली नाही. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले की ते आपलेपणाने विचारपूस करत होते, त्यांच्यानंतर ती आपलेपणाची भावना जानवली नाही अन् त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली, असे शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…































