विज्ञानाच्या आविष्कारात मोबाइलचा आविष्कार हा सर्वोत्कृष्ट समजला जातो. कारण, या एका मोबाइलमध्ये टीव्ही, घड्याळ, रेडिओ, ऑडिओ प्लेअर, कॅलक्युलेटर, लँडलाइन फोन, संगणक अशा कितीतरी वस्तू एकत्रितपणे आहेत. त्याचे काही महत्त्वाचे फायदे असले तरी त्याच्या अतिवा
?
तरुण पिढी ही सकाळी उठल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत सर्रास मोबाइलचा वापर करतात. अभ्यासाविषयी माहिती गोळा करणे, इतर अनेक ज्ञान इंटरनेटवरून घेताना फक्त काहीच वेळ घातला जातो. नाहीतर फेसबुक, द्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यावरच आपला अमूल्य वेळ वाया घालवत असल्यामुळे पालक वर्ग चिंचेत आहे. कोरोना काळात मोबाइलने अनेक ऑनलाइन शाळा व महाविद्यालये तसेच संस्थांचे वर्ग चालवले आहेत. अनेक व्यवहार, अति महत्त्वाच्या मिटींग या कोरोना काळात मोबाइलवर चालल्या. त्यामुळे मोबाइल जीवनात आवश्यक आहे. परंतु त्याचा अतिवापर होत असल्याचे वास्तव आहे. लहान मुलांना त्याचा लागलेला लळा ही चिंताजनक बाब असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मोबाइलमुळे मैदानी खेळ नामशेष : मोबाइलचा आविष्कार होण्याच्या अगोदर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वच व्यायाम तसेच विरंगुळा म्हणून अनेक मैदानी खेळ खेळायचे. त्यात व्यायामाबरोबर विरंगुळाही व्हायचा. त्यामुळे मुलाची शारीरिक कसरत व्हायची. सर्व घटकातील मुले एकत्र खेळायची. आता हे चित्र दिसत नाही. एकंदरीतच कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइल आता डोकेदुखी ठरत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.
जेवणासह बौद्धिक विकासावरही परिणाम ^मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळ्याचे विविध आजार उद्भवतात. अती चंचलता, लहान मुलांच्या बोलण्यावर परिणाम, मानसिक आजारचीही समस्या नाकारता येत नाही. तसेच मुले तासन््तास मोबाइलमध्ये गुंततात व जेवणाकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वजन वाढत नाही व बौद्धिक विकासावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. -डॉ.संतोष डाबेराव, बालरोगतज्ज्ञ.





























