महाराष्ट्र (मुंबई) : जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर रामालाही आता तुमचा कंटाळा आला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्य.
या संदर्भात चित्रा वाघ यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आणि अमेरिका, रशिया सारखे शक्तिशाली देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना, तुम्हाला अशी अवदसा का आठवते? तसेच बाळासाहेबांनी हेच शिकवलं का? असा प्रश्नही वाघ यांनी उपस्थित केला.
नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ ते देखील पहा….
सर्वज्ञानी रडतरौत, तोंड उघडलं की त्यातून वाहणारं ते गटार थांबवा.. देशावर, देशातील हिंदूंवर, आमच्या अस्मितेवर दहशतवादी हल्ला झाला आहे..आणि तुम्ही खुशाल अकलेचे तारे तोडत आहात..थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी…?
या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आणि अमेरिका, रशिया सारखे शक्तिशाली देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना, तुम्हाला अशी अवदसा का आठवते हो? वंदनीय बाळासाहेबांनी हेच शिकवलं का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला….!
दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समजताच देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व प्रमुख नेत्यांशी आणि सुरक्षा दलाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या..गृहमंत्री अमितभाई शहा तातडीने काश्मीरमध्ये पोहोचलेसुद्धा..एवढेच काय, आपला सौदी अरेबियाचा दौरा गुंडाळून स्वतः मोदीजी भारतात पोहचले आणि तुमची आपली वायफळ बडबड खुशाल सुरूच आहे !
एक लक्षात घ्या, केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे भक्कम आणि कर्तव्यदक्ष सरकार आहे. कोणालाही सुट्टी मिळत नाही.. दहशतवादाला तर नाहीच नाही..!
शेवटचे एकच सांगते.. गटारासारखं वाहणारं ते थोबाड सांभाळा आणि बंद करा..तुमच्यासारख्या नतद्रष्टांमुळेच राष्ट्र विरोधकांना ताकद मिळते आणि तिकडे पाकिस्तानचेही फावते !
शहाणे व्हा, दहशतवादाविरुद्ध लगेच ‘ॲक्शन मोड’ मध्ये येणारे हे सरकार आहे.. चार भिंतींच्या आड, एसी मध्ये बसून, तकलादू आदेश देणारं हे कर्तृत्वशून्य सरकार नाही..सध्या एवढंच ! सौ.दिव्यमराठी.






























