Homeदेश-विदेशATM सोबत मिळतो 10 लाख रुपयांचा मोफत विमा, असा करा क्लेम; बॅंक...

ATM सोबत मिळतो 10 लाख रुपयांचा मोफत विमा, असा करा क्लेम; बॅंक तुम्हाला सांगणार नाही या गोष्टी!


एटीएम मुक्त विमा: बँकेत खाते उघडताच तुम्हाला एटीएम कार्ड मिळतं. याला डेबिट कार्ड म्हणतात. याच्या मदतीने तुम्ही बँकेच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता, हे तुम्हाला माहिती असेल. आजच्या डिजिटल युगात लोकांनी रोख व्यवहार कमी करायला सुरुवात केलीय. तरीही एटीएमची गरज आजही आहे. एटीएमद्वारे व्यवहार करणे देखील सोपं झालंय. जर तुम्हाला काहीही खरेदी करायचे असेल तर ते एटीएमद्वारे सहज करता येते. एटीएममधूनही अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्याने त्याचा फायदा करुन घेता येत नाही. तुमच्याकडे एटीएम असेल तर कोणताही प्रीमियम न भरता विमा देखील उपलब्ध असतो. बँकांकडूनदेखील याबद्दल फारच कमी माहिती देण्यात येते.

बँकेकडून आपल्याला एटीएम कार्ड मिळत. त्याचप्रमाणे कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवर देखील जीवन विमा संरक्षण मिळते, हे बहुतेक लोकांना माहिती नसते. वैयक्तिक अपघाती विमा (मृत्यू) नॉन-एअर विमा डेबिट कार्ड धारकाला अकाली मृत्यूविरुद्ध विमा दिला जातो, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलीय.

एटीएम कार्डवर मोफत विमा रक्कम

जर तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले असेल तर तुम्ही मोफत विमा सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा दोन्हीचा समावेश असतो. आता तुम्ही या दोन्ही परिस्थितींमध्ये विम्याचा दावा करू शकता. यात कार्डच्या श्रेणीनुसार रक्कम निश्चित करण्यात आलेली असते. एसबीआय त्यांच्या गोल्ड एटीएम कार्ड धारकांना 4 लाख रुपयांचे (हवाई मृत्यू) आणि 2 लाख रुपयांचे (हवाई नसताना) कव्हर देते. तर प्रीमियम कार्ड कार्डधारकाला 10 लाख रुपये (हवाई मृत्यू) आणि 5 लाख रुपये (हवाई नसताना) चे कव्हर देते. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यासह अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या रकमेचे कव्हर देतात. काही डेबिट कार्ड 3 कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण देतात. हे विमा संरक्षण मोफत दिले जाते. यामध्ये बँकेकडून कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत.

डेबिट कार्ड वर्तन आवश्यक आहे

डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार विशिष्ट कालावधीत केले असतील तर विम्याचा फायदा तेव्हाच मिळतो. वेगवेगळ्या कार्डांसाठी हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. तुमच्या एटीएम कार्ड्सवर तुम्हाला विमा पॉलिसी सक्रिय करायची असेल तर कार्डधारकाला दर 30 दिवसांनी किमान एकदा व्यवहार करणे आवश्यक आहे. काही कार्डधारकांना विमा संरक्षण अॅक्टीव्ह करण्यासाठी गेल्या 90 दिवसांत एकदा व्यवहार करणे आवश्यक आहे.

नॉमिनीला मिळते दाव्याची रक्कम

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांवर जारी केलेल्या रुपे कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील मिळते. जर डेबिट कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनी संबंधित बँकेत जाऊन विम्याचा दावा करू शकतो.

दावा कसा करायचा?

जर एखाद्या एटीएम कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाला, तर काय करायच? जाणून घेऊया. ज्या कार्डधारकाचा मृत्यू झालाय त्याच्या नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला भरपाईसाठी अर्ज सादर करावा लागेल. यासोबतच आवश्यक कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतील. काही दिवसांनी नॉमिनीला विमा दावा मिळतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!