एखाद्या देशावर हल्ला झाल्यानंतर 24 तासांच्या आत बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव घेतला जातोय. म्हणजे आमच्या हातात बंदूक देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने थाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवल
?
भारत पाकिस्तानमधील युद्धाचा आर्थिक दृष्ट्या भारताला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देश आणि जनता भारताच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. तुम्ही आहात म्हणून नाही, एका पक्षासाठी नाही, तर या देशासाठी आपण कायमच एक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मॉकड्रील घ्यायचे असेल तर घेत राहा, मात्र तुम्ही काय करत आहात? हे दाखवा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दोन दिवसीय संसदेचे अधिवेशन मागणी
काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेचे अधिवेशन घेण्याची आमची मागणी आहे. काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेच्या अधिवेशन तुम्ही घ्यायला हवे आणि सर्वांशी मनमोकळी चर्चा करायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत होते तसे नाही. आम्हाला उणे दुणे काढायचे नाही. आम्ही एखाद्या पक्षासोबत नाही. मात्र आम्ही सरकार आणि देशासोबत आहोत. हा देश आमचा देखील असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
या सर्व गोष्टीचा विचार करून एकदा काय ते होऊन जाऊ द्या, किती दिवस टांगती तलवार कायम ठेवणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुढील काळात जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी आतापासून या देशातील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करायला हवे, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला. युद्ध करणे सोपे असते मात्र युद्धा नंतरची परिस्थिती निर्माण होते, तिचा सामना करणे अवघड असते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र हे सर्व करण्यापूर्वी देशाचे गृहमंत्री अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना पुढची परिस्थिती देखील सांभाळता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे.































