Homeमनोरंजनएखाद्या व्यक्तीला किती वेळा Heart Attack येऊ शकतो? कोणत्या वयात कोणत्या लोकांना...

एखाद्या व्यक्तीला किती वेळा Heart Attack येऊ शकतो? कोणत्या वयात कोणत्या लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका?


गेल्या काही वर्षांमध्ये Heart Attack मुळे अनेकांचे जीव गेले आहेत. हृदयरोग हा खराब आहार, बिघडणारी जीवनशैली, ताणतणाव आणि अनेक आरोग्य समस्यांमुळे होतो. कोविड-16 संसर्गानंतर हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांना जिम करताना हृदयविकाराचा झटका येतो, काहींना नाचताना किंवा गाताना हृदयविकाराचा झटका येतो आणि काहींना चालताना हृदयविकाराचा झटका येतो. लहान वयातच लोक हृदयरोगी होत आहेत. आता अलिकडेच एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलंय.

कोणत्या वयात कोणत्या लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका?

Heart Attack हा कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यतः, हार्ट अटॅक 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. गेल्या अनेक वर्षांत, तरुणांमध्ये अस्वस्थ कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येत आहे. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. 19-24 वयोगटातील लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दिसून आली आहे. आजकाल, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका 50 टक्क्यांनी वाढल्याचा पाहिला मिळतो.

लीलावती रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विद्या सुरतकल यांच्या मते, भारतात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. तरुणपणी दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल दिसून येते. कमी-घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) आणि उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन (HDL) असतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. एचडीएल हे हृदयासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आहे. 19-24 वयोगटातील लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असते. हे खाण्याच्या वाईट सवयींमुळे घडते. त्याच वेळी, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बहुतेकदा 35-50 वर्षे वयोगटात असतो. 10 पैकी 7 जणांना उच्च कोलेस्ट्रॉलचा आजार असतो. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान, अनुवांशिक विकार, थायरॉईड समस्या, अस्वास्थ्यकर आहार, उच्च रक्तदाब आणि कमी किंवा अजिबात शारीरिक हालचाल नसलेल्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका असतो.

एखाद्या व्यक्तीला किती वेळा Heart Attack येऊ शकतो?

तज्ज्ञ सांगतात की, एखाद्या व्यक्तीला तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण हे आवश्यक नाही, काही प्रकरणांमध्ये तीनपेक्षा कमी किंवा तीनपेक्षा जास्त हृदयविकाराचे झटके येण्याची शक्यता असते. तर 45 वर्षांच्या वयानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये 45 वर्षांनंतर Heart Attack धोका वाढतो. तर महिलांमध्ये साधारण 55 वर्षांनंतर त्याहून अधिक वयामध्ये तर रजोनिवृत्तिनंतर Heart Attack धोका असतो.

लहान वयातच हृदयविकाराचे झटके का येतात?

लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. वाईट जीवनशैली, ताणतणाव, अस्वास्थ्यकर अन्नाचे जास्त सेवन आणि लठ्ठपणा यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

हृदयविकाराची लक्षणे

लहान मुलांमध्ये ओठांभोवती निळे डाग हृदयविकाराचे लक्षण आहेत.
मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे.
थोडा वेळ चालल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे
बाळाच्या शारीरिक विकासाचा अभाव.
मुलाला छातीत दुखणे आणि चक्कर येण्याची तक्रार असू शकते.

मोठ्या लोकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी!

हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. सर्वप्रथम, तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. दारू आणि धूम्रपान यासारख्या वाईट सवयी सोडून द्या.

तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, अधिक फळे आणि भाज्या खा. त्याच वेळी, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके कमी खा. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, जास्त व्यायाम करण्याऐवजी योगा करा.

छातीत दुखणे, दातदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे इत्यादी हृदयाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरकडे जा.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!