Homeमनोरंजनशाहरुख खान आणि काजोल यांनी त्यांनी कधीही एकमेकांना का दिले नाही

शाहरुख खान आणि काजोल यांनी त्यांनी कधीही एकमेकांना का दिले नाही


बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा त्यात शाहरुख खान आणि काजोल यांचा उल्लेख होणार नाही हे अशक्यच आहे. करण-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. दोघांनी केलेला जवळपास प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दिलवाले चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांना तुम्ही सिंगल असता तर एकमेकांना डेट केलं असतं का? असं विचारण्याच आलं होतं.

जेव्हा त्यांना विचारलं की जर ते दोघेही सिंगल असते तर एकमेकांना डेट केलं असतं का, तेव्हा काजोल म्हणाली, “मला खरंच माहित नाही. कारण मला वाटतं की मी त्यावेळी अजयसह (अजय देवगण) नात्यात होतो. त्यादरम्यान आम्ही बाजीगर चित्रपटासाठी सहा महिने शुटिंग करत होतो”. त्यावर शाहरुखनेही विनोदी पद्धतीने उत्तर दिलं की, “मी पण त्यावेळी अजयला भेटत होतो”.

शाहरुख आणि काजोल यांनी पहिल्यांदा ‘बाजीगर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात शाहरुख खानने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘माय नेम इज खान’ यासारख्या चित्रपटांतील केमिस्ट्रीमुळे ते चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक ठरले होते.

दरम्यान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच, शाहरुखने सहा वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर हिंदू पद्धतीने गौरीशी लग्न केलं होते. 1997 मध्ये त्यांचा पहिला मुलगा आर्यन आणि 2000 मध्ये मुलगी सुहानाचा जन्म झाला. 2013 मध्ये त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे, अबरामचे स्वागत केलं. दुसरीकडे, काजोलने 1994 मध्ये अजय देवगणला डेट करायला सुरुवात केली आणि 1999 मध्ये अभिनेत्याच्या घरी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांन लग्न केलं. त्यांना मुलगी न्यासा देवगण आणि मुलगा युग देवगण अशी दोन मुलं आहेत.

शाहरुख शेवटचा राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात दिसला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. यानंतर तो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहे. ‘किंग’ नावाच्या या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. काजोल ‘मा’ चित्रपटात दिसणार आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा हॉरर चित्रपट 27 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!