Homeमहाराष्ट्रआप अतिशीचा आरोप आहे

आप अतिशीचा आरोप आहे


Rekha Gupta Husbund PWD DUSIB Officers Meeting : दिल्लीच्या राजकारणात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या पतीमुळे मोठा गोंधळ चालू झाला आहे. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता सार्वजनिक बांधकाम (PWD) व दिल्ली शहरी निवारा सुधार मंडळाच्या (DUSIB) अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. यासंबंधीचे कथित फोटो देखील त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अधिकारी मनीष गुप्ता यांच्याशी बातचीत करत असल्याचं दिसत आहे.

हे फोटो शेअर करत आम आदमी पार्टीने प्रश्न उपस्थित केला आहे की मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली सांभाळण्याइतक्या सक्षम नाहीत का? आता त्यांच्या पतीला दिल्लीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे का?

हेही वाचा

आतिशी यांचा गुप्ता यांच्यावर आरोप

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यानी एक्सवर काही फोटो शेअर केले आहेत. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की “हे फोटो जरा काळजीपूर्वक पाहा. एमसीडी, डीजेबी, पीडब्ल्यूडी आणि डीयूएसआयबी अधिकाऱ्यांची बैठक घेणारी ही व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता आहेत.

आतिशी यांच्याकडून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची महिला सरपंचाशी तुलना

आतिशी मार्लेना म्हणाल्या, “पूर्वी आपण ऐकायचो की एखाद्या गावात महिला सरपंच निवडून आली असेल तर तिचे सरकारी काम तिचा पती सांभाळतो. अशा घटना आपण पाहिल्या आहेत. याबद्दल काहीजण म्हणतात की सरकारी काम गावातील महिलांना कसं हाताळायचं ते माहिती नसतं. म्हणून सरपंच-पती ती कामे सांभाळतात. परंतु, अलीकडच्या काळात असे प्रकार कमी झाले आहेत. काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहेत. कारण, त्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यानंतर महिला सरपंचांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.”

हेही वाचा

मुख्यमंत्री-पतीने सरकार चालवणं अत्यंत धोकादायक : आतिशी

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, “आता महिला सरपंच त्यांची सरकारी कामे करू लागल्या आहेत. मात्र, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की एखादी महिला मुख्यमंत्री झाली आहे आणि तिची सर्व सरकारी कामे तिचे पती करत आहेत. रेखा गुप्ता यांना सरकारी कामे कशी करायची ते माहिती नाहीये का? दिल्लीत अनेक ठिकाणी सलग काही तास वीजपुरवठा खंडित होत आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांची कामे कशी करायची ते माहिती नसल्यामुळे हे घडतंय का? रेखा गुप्ता वीज कंपन्यांचे व्यवस्थापन करू शकत नाहीत का? खासगी शाळांचं शुल्क (फी) वाढवण्यात आलं आहे याचं कारणही तेच आहे का? रेखाजी शिक्षण विभाग सांभाळू शकत नाहीत का? मुख्यमंत्री-पतीने सरकार चालवणं अत्यंत धोकादायक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!