Homeदेश-विदेशभारतीय रेल्वे डायमंड क्रॉसिंग नागपूर रेल्वे तथ्य

भारतीय रेल्वे डायमंड क्रॉसिंग नागपूर रेल्वे तथ्य

भारतीय रेल्वे मनोरंजक तथ्ये: रेल्वेनं प्रवास करत असताना अनेकदा काही अशा गोष्टी नजरेस पडतात, ज्या कळत नकळत आपल्या विचारांमध्ये जागा मिळवून जातात. हे असंच का, ते तसंच का? अशा प्रश्नांचा काहूरही माजवतात. असाच एक प्रश्न आहे देशभरात पसरलेल्या रेल्वे रुळाच्या जाळ्याचा.

रेल्वे प्रवास करताना खिडकीतून डोकावल्यास पसरलेलं रेल्वे रुळांचं जाळं नकळतच लक्ष वेधून जातं. बऱ्याचदा हे रुळच चालत आहेत की काय, असा भासही होतो. यापैकी काही रुळ एकमेकांशी जोडलेले असतात, काही रुळ नवं वळण घेतात. आश्चर्याची बाब म्हणजे रुळ बदलत ही रेल्वे अपेक्षित स्थानकांवर पोहोचते आणि प्रवास सुकर करते. रेल्वे रुळांचाच एक प्रकार असणाऱ्या, डायमंड क्रॉसिंगविषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का?

डायमंड क्रॉसिंग म्हणजे नेमकं काय?

डायमंड क्रॉसिंग ही एका विशेष प्रकारची क्रॉसिंग असून, ती महत्त्वाच्या परिस्थितीमध्येच तयार केली जाते. रेल्वे रुळाच्या जाळ्यातील हा एक असा बिंदू असतो जिथं चारही बाजूंनी रेल्वेगाड्यांची ये-जा होते. अर्थात इथं चारही बाजूंनी रेल्वे क्रॉसिंग होतं. यामध्ये रेल्वे रुळ एकमेकांना छेदून निघतात आणि एक अशी आकृती तयार करतात जिथं हा आकार एखाद्या उभ्या चौकडीसारखा किंवा सोप्या शब्दांत सांगावं तर एखाज्या शंकरपाळीसारखा दिसतो.

डायमंड रेल्वे क्रॉसिंगमध्ये जवळपास चार ट्रॅक असतात. जिथं दोन-दोन रुळ एकमेकांना छेदतात. प्रथमदर्शनी हा आकार एखाद्या हिऱ्यासारखाही दिसतो. त्यामुळं या रचनेला डायमंड क्रॉसिंग असंही म्हणतात. ज्याप्रमाणं एखाद्या रस्त्यावर चारही बाजूंनी वाट जाऊन मध्ये एक आकार तयार होतो अगदी तसाच आकार रेल्वे रुळांमुळंही तयार होतो. डायमंड क्रॉसनं रेल्वे पुढे जात असताना अशा पद्धतीनं नियोजन केलं जातं की कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही.

प्रत्यक्षात भारतभर रेल्वेचं जाळं पसरलं असलं तरीही डायमंड क्रॉसिंगची ही रचना फक्त नागपूरमध्येच पाहायला मिळते. नागपूरमधील संप्रीती नगर स्थित मोहन नगर इथं ही डायमंड क्रॉसिंग आढळते. या अनोख्या क्रॉसिंगमधील एक रुळ हा पूर्वेकडून गोंदियाहून येतो, दुसरा रुळ दक्षिण भारतातून येत आणि एक रुळ दिल्लीतून येतो. दिल्लीतून येणारा हा रुळ उत्तरेकडून आलेला असून पश्चिमेकडून म्हणजेच मुंबईच्या दिशेनं येणारा रुळही या डायमंड क्रॉसिंगला जोडला जातो. या क्रॉसिंगनं एकाच वेळी दोन रेल्वे पुढे जाणं शक्यच नसून, इथून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेची वेगळी वेळ निर्धारित आहे.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!