Homeमहाराष्ट्रजंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल,...

जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे याप्रकरणी पंतप्रधानांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस शिक्षणमंत्री होणार संजय राऊत म्हणाले की, जोशी हे फक्त कोळसामंत्री म्हणून चांगले काम करू शकतात. नवीन मंत्री आल्यावर कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची वेळ येईल. त्यांना नीट म्हणजे काय, हे आधी विचारले पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे मंत्रीपद दिले जाऊ शकते आणि पंतप्रधानांनी तसे ठरवले असण्याची शक्यता वर्तवत, तसे झाले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपकडे संयम-विनम्रता नाही संजय राऊत म्हणाले की, संयम आणि विनम्रता हे शब्द भाजपच्या शब्दकोशातून गायब झाले आहेत. पण जेव्हा युवा शक्तीपुढे मोदींसारख्या नेत्यांना झुकावे लागते, तेव्हा हिटलरसारख्या सत्ताधीशांना झुकवल्याचा आनंद जनतेला होतो. या लढ्यात 21 मुलांचे बळी गेले असून अनेकांचे डोके फुटले आहे, असे सांगत आधी नियोजित असलेला मोर्चा रद्द करून आता कोणतीही पक्षीय निशाणी न वापरता ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांसारखे विरोधकांनी एकत्र यावे संजय राऊत म्हणाले की, तरुणांच्या विचार आणि भाषेपुढे आयटी सेलला हार मानावी लागली. बहुमताचा माज दाखवून हिटलरसारखे वागाल, तर सत्तेतून तसेच बाहेर जावे लागेल, हा धडा राज्यकर्त्यांनी घ्यावा. जंतर-मंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या, तसेच मतचोरी आणि आमदार-खासदार फोडाफोडीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, तर मोदी सरकार एक दिवसही टिकणार नाही. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवर जवळपास 35 मिनिटे चर्चा केली असून, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याशीही संवाद साधला आहे. ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते मोडून काढण्यासाठी ही चर्चा झाल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार:तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी, सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण

0
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!