Homeमहाराष्ट्रतीन जलकुंभाची उभारणी, 99 लाखांचा खर्च तरीही गाव तहानलेलेच:पिंपळखुटा गावातील प्रकार; नळपाणी...

तीन जलकुंभाची उभारणी, 99 लाखांचा खर्च तरीही गाव तहानलेलेच:पिंपळखुटा गावातील प्रकार; नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल तीन जलकुंभाची उभारणी झाली तसेच 99 लाख रुपयांचा खर्च झाल्यानंतरही गाव तहानलेलेच असून या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 21 केली आहे. पिंपळखुटा गावातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर झाले होते. याकामांवर आतापर्यंत 99 लाख रुपयांचा खर्चही झाला आहे. या योजनेमध्ये एक जलकुंभ उभारण्यात आला तर यापुर्वीच्या योजनेतील दोन जलकुंभ असून गावात 3 जलकुंभ झाले आहेत. मात्र एकाही जलकुंभापर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे. सध्या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही गावकऱ्यांना खाजगी नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, या कामांवर झालेला 99 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात गावकरी रवी गायकवाड, संतोष पाखरे, मनोज खंदारे, विशाल खंडागळे, सतिश कांबळे, सुनील गायकवाड, पवन जाधव, सुरेश जाधव, ज्योतीबा गायकवाड, धम्मपाल कांबळे, धम्मानंद कांबळे, राहुल कांबळे, अमोल गायकवाड, विठ्ठल गायकवाड, पुंजाजी खंदारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात...

0
जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

नेपाळमध्ये जातीय हिंसाचार उसळला, 2 लोकांचा मृत्यू:अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू; कावड यात्रेदरम्यान डीजे वाजवण्यावरून...

0
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवार रात्री कावड यात्रेदरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून सुरू झालेला एक किरकोळ वाद आता मोठ्या जातीय तणावात बदलला आहे. सुरुवातीला...
spot_img

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
error: Content is protected !!