Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकआनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व

आनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व

प्रस्तावना

गुरू हे जीवनाला योग्य दिशा देणारे असतात. श्री दत्तगुरूंनी जसे २४ गुणगुरु केले, तसे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक प्रसंगातील गुण पाहण्याची दृष्टी गुरू देतात. परंतु आपण बहुधा स्वतःतील आणि इतरांतील गुणांकडे न पाहता स्वभावदोष व उणिवांकडेच लक्ष देतो. त्यामुळे जीवनातील आनंदाचे अनेक क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो. प्रत्यक्ष आनंदी जीवन जगण्यासाठी श्री दत्तगुरूंप्रमाणे प्रत्येकातील गुण पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं कसे दूर होतात, तसेच आनंदमय जीवनाकडे वाटचाल कशी होते, यासंदर्भात माहिती सनातन संस्थेने संकलित केलेल्या या लेखातून पाहू.

गुरुकृपेचे महत्त्व

श्री गुरुचरित्र (१३:१३०) मध्ये म्हटले आहे, “गंगेमुळे पाप, शशीमुळे ताप आणि कल्पतरूमुळे दैन्य नाहीसे होते; परंतु श्रीगुरूंच्या दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य या तिन्हींचे हरण होते.” गुरु जीवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरुकृपेमुळे साधकाच्या जीवनात अंतर्मुखता, सात्त्विकता आणि आत्मिक आनंद निर्माण होतो. ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसल्याने ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष व अहं दूर करणे आवश्यक आहे. साधनेमुळे मन शुद्ध होऊन सूक्ष्मदृष्टी जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनतो. हे गुरुकृपेने साध्य होत.

अष्टांग साधना

नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्‌साठी त्याग, निरपेक्ष प्रेम, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भाववृद्धी हे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेचे टप्पे आहेत. यामुळे आध्यात्मिक उन्नती होते.  “सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो” हा भाव अष्टांग साधनेने साधकात निर्माण होतो.

 

आजच साधना सुरू करा

तरुणांनी वृद्धापकाळाची वाट न पाहता तरुण वयातच साधना आरंभ करावी; कारण मनुष्यजन्माचा खरा उद्देश ईश्वरप्राप्ती हा आहे. वृद्धापकाळात विविध व्याधीं सुरू झाल्याने तिकडेच लक्ष अधिक असत. त्यावेळी व्याधी सुसह्य होण्यासाठी साधना आवश्यक आहे. गुरुकृपेच्या बळावर साधक आनंदमय जीवन जगण्यास सक्षम होतो.

गुरुतत्त्वाच्या चरणी प्रार्थना

अशा प्रकारे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेने साधकाला स्वभावदोष व अहं-निर्मूलनातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेऊन कलियुगातील अस्थिर जीवनात चिरंतन आनंद मिळतो. म्हणूनच गुरुकृपायोग हा केवळ साधनेचा मार्ग नसून आनंदमय आदर्श जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आपल्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करून जीवनातील प्रत्येक क्षणाचा खरा आनंद अनुभवणे, हीच गुरुकृपा आहे. या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुतत्त्वाच्या चरणी आपण प्रार्थना करूया— “हे भगवंता, हे गुरुमाऊली, आम्हाला जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येऊ दे. त्यासाठी आमच्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करण्याची शक्ती, तळमळ आणि सातत्यपूर्ण साधना करण्याची प्रेरणा आम्हाला द्या.”

संदर्भ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

संकलक : प्रा.विठ्ठल जाधव, सनातन संस्था.

संपर्क क्रमांक : 7038713883

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा...

0
निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत...

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

0
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे...

चंदीगड न्यायालयात दीपके-वांगचुक, कामरा यांच्यावर FIR ची मागणी:वकिलाची याचिका- जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनात अपमानकारक...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
spot_img

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...

नकारात्मक विचारांना हरवेल ‘ब्रॅग फोल्डर, येथे जमा करा यश:मेंदू पराभव लक्षात ठेवतो, विजय नाही;...

0
कधी लक्ष दिलं आहे का... फोनच्या गॅलरीमध्ये जुन्या पावत्या, निरुपयोगी स्क्रीनशॉट्स आणि अनेक वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे फोटो भरलेले असतील. पण जर तुम्हाला विचारलं की...

कंगना म्हणाली- जेन-झी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते:यांची कशी वाढ होत आहे; ‘कॉकरोच’सारखे वागून...

0
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर निशाणा साधला आहे. कंगनाने...
error: Content is protected !!