Homeमहाराष्ट्रनिवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप-...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

निवडणूक तोंडावर असताना सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक अटी लागू करून महिलांना या योजनेतून वगळण्याचे पाप करत आहे. या योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली असून, आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे लोक जेव्हा या महिलांकडे मतदान मागायला जातील, तेव्हा महिला त्यांना नक्कीच जाब विचारतील, असा थेट इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच, सरकारच्या तिजोरीत पैसे नसून, मोक्याच्या सरकारी जमिनी कवडीमोल भावाने उद्योजकांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत इतक्या अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत की, तिचा लाभ केवळ 12 ते 15 लाख शेतकऱ्यांनाच होणार आहे. या निकषांमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असून, सामान्य शेतकऱ्यांना जो त्रास व्हायचा तो होणारच आहे. जर केवळ मोजक्याच लोकांना याचा फायदा होणार असेल, तर सरकार याला ‘सरसकट कर्जमाफी’ कसे काय म्हणू शकते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कर्जमाफीतून बाद करण्याचा कट विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे लोक आयकर भरतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांकडून ‘फॉर्म नंबर 16’ भरून घेतला जातो. वास्तविक पाहता कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे देखील हा फॉर्म भरतात, परंतु त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न काहीच नसते. अशा लाखो गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक कारणे दाखवून कर्जमाफीतून बाद करण्याचा कट सरकारने रचला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात अत्यंत चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्यात अंतर्गत पातळीवर नेमके काय शिजत आहे. विधान परिषदेला दराडे का पडले याचे खरे कारण केवळ त्यांनाच ठाऊक असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!