Homeमहाराष्ट्रफडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार,...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये जाण्यात रस नाही- एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावले होते आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे. मात्र, महाजन यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि ‘ब्लॅकमेलिंग’च्या राजकारणामुळे हा प्रवेश रखडल्याचा आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे पुढे म्हणाले, गिरीश महाजन आता सांगत आहेत की मी खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला नव्हता. पण मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले की, तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत.खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू, अशी ब्लॅकमेलिंग केली जात आहे. यामुळे वरिष्ठांनी मला सांगितले की, तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू. मला आता भाजपमध्ये जाण्यात अजिबात रस नाही एकनाथ खडसे म्हणाले की, विनोद तावडे आणि माझी झालेली भेट ही केवळ एक औपचारिक भेट होती. त्यांनी फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस केली, यापलीकडे आमच्यात कोणताही राजकीय विषय किंवा चर्चा झालेली नाही. मला आता भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस राहिलेला नाही. मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच ठामपणे उभा राहीन. माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, पण मी जाणार नाही. माझे कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना तशी मुभा आहे, मात्र माझा निर्णय पक्का असून मी पवारांसोबतच राहणार आहे. महाजनांवर लक्ष देण्याची गरज नाही गिरीश महाजन यांनी खडसेंवर केलेल्या टीकले उत्तर देताना खडसे मिश्कीलपणे म्हणाले की, महाजन म्हणतात की मी फार लहान माणूस आहे, हे खरं आहे. पण ते स्वतः आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांच्या मतदारसंघात तसे बोर्ड देखील लागले आहेत. मी आज त्यांच्याशीच संघर्ष करत आहे. ते मंत्री होईपर्यंत मी त्यांना त्यांच्या मतदारसंघात नेहमीच सहकार्य केले आहे. माझ्या सभा झाल्याशिवाय त्यांचा प्रचार कधी पूर्णच होत नव्हता. सध्या त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आशीर्वाद आहे. पण हा आशीर्वाद जर उद्या काढून घेतला, तर महाजन कुठेच नसतील अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या विधानांवर फार लक्ष देण्याची गरज नाही.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!