Homeमहाराष्ट्रतीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन;...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत 6.45 कोटी रुपये

श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार, १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना साईबाबांना वस्त्र अर्पण करण्याची, तसेच साईबाबांनी परिधान केलेले वस्त्र प्रसादरूपाने प्राप्त करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय देणगीच्या रकमेनुसार भाविकांना व्हीआयपी व व्हीव्हीआयपी आरती दर्शनाची सुविधाही दिली जात आहे. सोशल मीडियावरील प्रभावी प्रचार आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे शिर्डीकडे भाविकांचा ओढा कमालीचा वाढला आहे. परिणामी रोख देणगी, ऑनलाइन देणगी, सोने-चांदी यासोबतच वस्तूरूप देणग्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. तीन वर्षांत साईबाबांना १९ हजारांहून अधिक शाली अर्पण करण्यात आल्या आहेत. लिलाव, प्रसाद विक्रीतून कोट्यवधींचे उत्पन्न साईबाबांनी परिधान केलेली ही वस्त्रे नंतर लिलावाद्वारे किंवा प्रसादरूप विक्रीच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून दिली जातात. या संपूर्ण प्रक्रियेतून संस्थानला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत वस्त्रांच्या लिलावातून ७३ लाख ४५ हजारांहून अधिक, तर कापड कोठीतील प्रसादरूप विक्रीतून ५ कोटी ७१ लाखांहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. भाविकांच्या श्रद्धेपोटी अर्पण होणाऱ्या या वस्त्रांमुळे संस्थानच्या उत्पन्नात मोलाची भर पडत आहे. शिर्डीत देशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढ होत आहे. देणगीचा उपयोग भक्तांच्या सुविधेसाठी देश-विदेशातील भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. भाविकांकडून अर्पण होणाऱ्या शाली, वस्त्रे आणि इतर देणग्या ही त्यांच्या भक्तिभावाची प्रचिती आहे. वस्त्र अर्पण, संगणकीकृत सोडत आणि प्रसादरूप वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. भाविकांनी दिलेल्या प्रत्येक देणगीचा उपयोग साईबाबांच्या सेवेसह भक्तांना सुविधा व उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. – गोरक्ष गाडिलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पारदर्शक सोडत प्रक्रिया एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत साईबाबांच्या समाधीवर एकूण १९ हजार ७६ शाली अर्पण करण्यात आल्या. या शालींचे एकूण मूल्यांकन सुमारे ३ कोटी ५९ लाख रुपये इतके आहे. देणगी काउंटरवर प्राप्त होणाऱ्या वस्त्रांची रीतसर नोंद करून त्यांची संगणकीकृत सोडत काढली जाते. निवड झालेल्या भाविकांची नावे संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातात व त्यानंतरच ती वस्त्रे साईबाबांना आरतीवेळी परिधान करण्यात येतात.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!