Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?:अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात पैसे येणार

शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?:अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात पैसे येणार

अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्यातील बळिराजाला मुख्य प्रवाहा आणण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना थेट आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सततचा अवेळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उमेदीने शेती करता यावी, यासाठी शासनाने ही योजना ‘नवसंजीवनी’ म्हणून आणली आहे. खरीप हंगामाच्या अगदी तोंडावर हा लाभ मिळणार असल्याने लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर; ‘अशी’ जाहीर होणार यादी या योजनेमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा गैरव्यवहार होऊ नये, म्हणून ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा गोळा केलेला तपशील संगणकीय प्रणालीद्वारे पडताळला जात असून, अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. हे नाव शेतकऱ्यांना सहज पाहता यावे, यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँक शाखा, विकास सोसायट्या आणि ‘आपले सरकार सेवा केंद्रांवर’ या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तसेच पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारेही याची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे शासनाने बंधनकारक केले आहे. यादीत नाव आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड किंवा यादीतील विशिष्ट क्रमांकासह नजीकच्या बँकेत किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ (CSC) जावे. तेथे बायोमेट्रिक पद्धतीने आपल्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. खात्याची आणि रकमेची खात्री करून शेतकऱ्याने मान्यता दिल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग होईल. OTS (एकवेळ समझोता) योजनेतील लाभार्थ्यांनी आधी स्वतःच्या हिश्शाची रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासनाची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्रिसूत्री ही योजना केवळ सरसकट कर्जमाफी नसून सर्व स्तरांतील शेतकऱ्यांचा विचार करून तिची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. या योजनेत प्रामुख्याने तीन टप्पे आहेत:



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!