परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रथम स्वच्छता गृहाचे (प्रसाधन गृह) निरीक्षण केले. स्वच्छता गृहाच्या प्रवेशद्वारावर ‘१ जून २०२६ पासून मोफत सेवा’, असा फलक होता; तर आतमध्ये शौचालयाकडे जाणाऱ्या भिंतीवर ‘प्रथम पैसे द्या’, असे ऑइल पेंटने नमूद केले होते. यावरून सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत फलकांबाबत हा गोंधळ का? असा सवाल केला. त्यानंतर लगेच तेथील कर्मचाऱ्यांनी आतमधील “प्रथम पैसे द्या’, हे पुसण्याची प्रक्रिया सुरू केली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्त १ जूनपासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रवाशांना एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार येत आहे. दरम्यान ८ जून रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमासाठी अकोल्यात परिवहन मंत्री तथा पक्षाचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक आले. त्यांनी प्रथम थेट मध्यवर्ती बस स्थानक परिसराची पाहणी केली. बसस्थानकातील स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनासरनाईक यांनी दिल्या. यावेळी एसटी स्टँडजवळच खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस उभी करण्यात येत असून अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका महामंडळावर बसत असल्याचा प्रकार माध्यमांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लक्षात आणून दिले. यावर २०० मीटर परिसरात अशी वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाईचा आदेश दिल्याचे सरनाईक म्हणाले. याच अनुषंगाने महामंडळावर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले. सरनाईक मध्यवर्ती बस स्थानकावरून ११.३५ च्या सुमारास गोरक्षण रोडवरील कार्यक्रमस्थळी रवाना झाले. त्यानंतर दुपारी २.१७ च्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकाच्या अगदी आवार भिंतीला लागूनच कारंजाकडे जाणारी खासगी बस प्रवाशांसाठी उभी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे खासगी प्रवाशी बस चालक कोणत्याच इशाऱ्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जुने व नवीन बस स्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र दौरा संपताच पुन्हा “जैसे थे’ स्थिती झाल्याचे दिसून आले. विविध कामांसाठी १५ कोटी खर्च होणार असून, मध्यवर्ती बस स्थानकांवर दिवसेंदिवस वर्दळ वाढतच आहे. एसटी बसस्थानक हे प्रवाशांच्या विश्वासाचे केंद्र बनावे, यासाठी स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. सरनाईक यांच्या स्वागतासाठी स्थानकाच्या मुख्यद्वारावर स्वागताची तयारी करण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वच्छतागृहाकडे धाव घेत पाहणी केली. एसटीचे कर्मचारी व प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. त्यांना मदतीसाठी टोलफ्री क्रमांक कोणता आहे, हेही विचारले. बसस्थानक परिसरात काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत एसटी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित केले. बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक-वाहकांची उपस्थिती, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरनाईक हे मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी करत असतानाच मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत होती. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला केव्हा काम सुरू करतो, यासह अन्य माहिती विचारली. मंत्री स्थानकातून जाताच बाहेरच खासगी बस उभी प्रवासी, कर्मचाऱ्यांशी संवाद
Source link
स्वच्छतागृहातील फलकांवरुन परिवहन मंत्र्यांनी विचारला जाब:प्रताप सरनाईकांनी केल्या एसटी अधिकाऱ्यांना सूचना
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























